मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी विमानांचा मोठा अपघात टळला आहे.


हाती आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी एका प्रवासी विमानाचे पंख एकमेकांना धडकले. जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते.


कोइम्बतूरला जाण्यासाठी मागे सरकणारे एअर इंडियाचे विमान एआय २७३२ आणि हैदराबादहून आगमन झाल्यानंतर विमानतळाच्या टॅक्सी वे वरून पुढे सरकत असलेले इंडिगोचे विमान ६ई ७९१ यांच्यात टक्कर झाली. दोन्ही प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


एअर इंडियाचे विमान उड्डाणासाठी प्रतीक्षेत होते आणि टॅक्सी वे वर पुढे सरकण्यासाठी वाट बघत होते त्याचवेळी दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या संपर्कात आले. दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांचा संपर्क झाला, ज्यामुळे आमच्या विमानाच्या पंखांच्या टोकाचे नुकसान झाले, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, एअर इंडियाचे विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी रिकामे केले आहे आणि थांबवले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे आणि तंत्रज्ञ विमानाची तपासणी करत आहेत. प्रवासी सुरक्षित असून पर्यायी विमानाने लवकरच पुढील प्रवास सुरू करतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.


विमानतळावरील घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाला अर्थात डीजीसीएला देण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीसाठी एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही एअर इंडियाने सांगितले.


इंडिगोचे विमान विमानतळावर पार्क केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंडिगोच्या विमानाची तंत्रज्ञांद्वारे तपासणी सुरू आहे. इंडिगोनेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)