मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी विमानांचा मोठा अपघात टळला आहे.


हाती आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी एका प्रवासी विमानाचे पंख एकमेकांना धडकले. जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते.


कोइम्बतूरला जाण्यासाठी मागे सरकणारे एअर इंडियाचे विमान एआय २७३२ आणि हैदराबादहून आगमन झाल्यानंतर विमानतळाच्या टॅक्सी वे वरून पुढे सरकत असलेले इंडिगोचे विमान ६ई ७९१ यांच्यात टक्कर झाली. दोन्ही प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना धडकले. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


एअर इंडियाचे विमान उड्डाणासाठी प्रतीक्षेत होते आणि टॅक्सी वे वर पुढे सरकण्यासाठी वाट बघत होते त्याचवेळी दुसऱ्या कंपनीच्या विमानाच्या संपर्कात आले. दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांचा संपर्क झाला, ज्यामुळे आमच्या विमानाच्या पंखांच्या टोकाचे नुकसान झाले, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, एअर इंडियाचे विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी रिकामे केले आहे आणि थांबवले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे आणि तंत्रज्ञ विमानाची तपासणी करत आहेत. प्रवासी सुरक्षित असून पर्यायी विमानाने लवकरच पुढील प्रवास सुरू करतील, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.


विमानतळावरील घटनेची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाला अर्थात डीजीसीएला देण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीसाठी एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही एअर इंडियाने सांगितले.


इंडिगोचे विमान विमानतळावर पार्क केले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंडिगोच्या विमानाची तंत्रज्ञांद्वारे तपासणी सुरू आहे. इंडिगोनेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध