Raj Thackeray: राज ठाकरेंसमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला 'उबाठा'बाबत तक्रारींचा पाढा

- मुंबई पालिका निवडणुकीत मनसेच्या वॉर्डात 'उबाठा'ची मते फिरली?


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसेच्या अंतर्गत असंतोषाला उघडपणे वाट मोकळी करून देणारी महत्त्वाची बैठक सोमवारी (२ फेब्रुवारी) वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीत पराभूत उमेदवार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ‘उबाठा’ गटाबाबतच्या तक्रारी मांडत, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोप केला.


बैठकीत उपस्थित उमेदवारांनी सांगितले की, मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये उबाठा गटाची मते मनसेकडे वळली नाहीत. निवडणुकीदरम्यान उबाठा गटाने प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्यामुळे मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा करण्यात आला. अनेक मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, थोड्या फरकाने विजय हुकल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनी उमेदवारांनाच सवाल करत, युती असली तरी स्थानिक पातळीवर तुमची स्वतःची तयारी किती होती, असा थेट प्रश्न उपस्थित केला. केवळ युतीवर अवलंबून राहून निवडणूक जिंकता येत नाही, असेही ते म्हणाल्याचे समजते.


बैठकीत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आपली भूमिका मांडली. जागावाटपाच्या वेळी मनसेला ताकदीचे वॉर्ड मिळाले नसल्याचा परिणाम निकालांवर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या वॉर्डांमध्ये मनसेची पकड भक्कम होती, त्या वॉर्डांऐवजी तुलनेने कमजोर मतदारसंघ देण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


माध्यमांशी बोलणे टाळले


बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार नाही, एवढे स्पष्ट करत ते निघून गेले. तर, मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही बैठक पूर्णतः अंतर्गत असल्याचे सांगितले. बैठकीतील चर्चेचा तपशील कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी उबाठा गटाबाबत प्रतिक्रिया देणे टाळले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र