सुप्रभात

संत नामदेव

पांढरे दूधही पांढरे । चवी जेवणारे जाणविते ॥
केळाच्या पाटीवर ठोविला दोडका । तोचि म्हणे विका तेणे मोले ॥
ढोर म्हणती आम्हा हाकारलास । वारुवा सारको खाऊ था घास ॥
मंदल्याजेती घरोघरी जाती । धृपदासाठी ताक मागती ॥
नामा म्हणे सोपी कवित्वे झाली फुका ।
हरि हरि म्हणा आपुलिया सुखा ॥

आपल्या भोवतालची परिस्थती कशीही असली तरी सूज्ञ माणूस त्यातून योग्य त्या पर्यायाची निवड करतो आणि योग्य निर्णयाद्वारे आपले ईप्सित साध्य करतो. या अभंगात संत नामदेव म्हणतात, ताक आणि दूध दोघांचाही रंग पांढरा असतो. पण चवीने जेवणारांना त्यातला फरक ठाऊक असतो. केळ्यांच्या पाटीत दोडका ठेवला आणि तोही केळ्यांच्या भावाने विका असे म्हणणे चूक आहे. गुरेढोरे म्हणतात, 'आम्हाला भरपूर श्रम देऊन हाकारीत आणलत. आता अश्वाप्रमाणे आम्हालाही चाऱ्याचा घास घेऊ द्या. घरोघरी गायन करून भाटगिरी करणारे लोक धृपद गाण्यासाठी दुसरे काही नाही तरी ताक तरी द्या अशी मागणी करतात. ट ला ट लावून फुकाचे काव्य करणारे खूप झालेत. खरं तर आपलं आयुष्य सुखवत करायचे असेल तर 'हरि हरि' म्हणणे हाच महत्त्वाचा मंत्र आहे. कवितेच्या नावाने ट ला ट लावून रचना करणाऱ्या आणि त्या जोरावर आपला निर्वाह करणाऱ्या कवींवर संत नामदेवांनी कडक भाषेत प्रहार केले आहेत. आपल्या दर्जाहीन कवित्वाच्या जोरावर हे तथाकथित कवी सोन्याच्या मोलाने आपली माती विकावी अशा खटपटी लटपटी करतात. एखाद्या कवितेचे धृपद म्हणायचे असले तरी त्यासाठी घरोघर जाऊन पोटाची खळगी भरण्याचा उधोग करतात. खरंतर या कवींना अभिजात काव्याचा काहीच गंध नसतो. 'ना अभ्यास, 'ना व्यासंग, ना प्रामाणिक निष्ठा. त्यामुळे रचना करून त्याला लोकांनी काव्य म्हणावे आणि आपला सन्मान करावा अशी त्यांची अपेक्षा असते. केळी आणि दोडका यांचे रूप वेगळे, चव वेगळी, मात्र दोडक्याप्रमाणे असणारे लोक केळीच्या भावाने आपली गणना करावी, अशी अपेक्षा करतात. समाजातील ढोंगी आणि दिखाऊ लोकांच्या स्वार्थी प्रवृत्तीवर संत नामदेवांनी नेमके बोट ठेवले आहे.

Comments
Add Comment

संचिताचा जीवनावर प्रभाव

आपल्या प्रबोधनाचा विषय म्हणजेच "अंधारातून प्रकाशाकडे" हा पाहताना, आपण इतरही काही महत्त्वाचे विषय समजावून

ईश्वराचे अस्तित्व

मानवजातीच्या इतिहासात “ईश्वर आहे का?” हा प्रश्न केवळ धार्मिक नसून तत्त्वज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र आणि

विठूची पुरणपोळी भक्तीचा उत्सव

"शिखरशिंगणापुरची आख्यायिका जुनी..." "विठ्ठलाला पुरणपोळी अर्पणाची धुनी..." "वाद नको नियमांचा, भावच खरी

“हरि बोल...!’’

काझीसाब, आज आपला सारा गावच पागल झालाय, असे वाटतेय. प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द येतोय.. “हरि बोल... हरि

संत नामदेव

बाप कवणाचा माय कवणाची बाप कवणाचा माय कवणाची । सोयरी धायरी तेही कवणाची ॥ द्रव्य संपत्ती देखती तंवचि मानिती

मानवी संस्कृती

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज जगात जे काही चाललेले आहे ते सर्वकाही संस्कारांमुळे चाललेले आहे. अनिष्ट