सुप्रभात

संत नामदेव

पांढरे दूधही पांढरे । चवी जेवणारे जाणविते ॥
केळाच्या पाटीवर ठोविला दोडका । तोचि म्हणे विका तेणे मोले ॥
ढोर म्हणती आम्हा हाकारलास । वारुवा सारको खाऊ था घास ॥
मंदल्याजेती घरोघरी जाती । धृपदासाठी ताक मागती ॥
नामा म्हणे सोपी कवित्वे झाली फुका ।
हरि हरि म्हणा आपुलिया सुखा ॥

आपल्या भोवतालची परिस्थती कशीही असली तरी सूज्ञ माणूस त्यातून योग्य त्या पर्यायाची निवड करतो आणि योग्य निर्णयाद्वारे आपले ईप्सित साध्य करतो. या अभंगात संत नामदेव म्हणतात, ताक आणि दूध दोघांचाही रंग पांढरा असतो. पण चवीने जेवणारांना त्यातला फरक ठाऊक असतो. केळ्यांच्या पाटीत दोडका ठेवला आणि तोही केळ्यांच्या भावाने विका असे म्हणणे चूक आहे. गुरेढोरे म्हणतात, 'आम्हाला भरपूर श्रम देऊन हाकारीत आणलत. आता अश्वाप्रमाणे आम्हालाही चाऱ्याचा घास घेऊ द्या. घरोघरी गायन करून भाटगिरी करणारे लोक धृपद गाण्यासाठी दुसरे काही नाही तरी ताक तरी द्या अशी मागणी करतात. ट ला ट लावून फुकाचे काव्य करणारे खूप झालेत. खरं तर आपलं आयुष्य सुखवत करायचे असेल तर 'हरि हरि' म्हणणे हाच महत्त्वाचा मंत्र आहे. कवितेच्या नावाने ट ला ट लावून रचना करणाऱ्या आणि त्या जोरावर आपला निर्वाह करणाऱ्या कवींवर संत नामदेवांनी कडक भाषेत प्रहार केले आहेत. आपल्या दर्जाहीन कवित्वाच्या जोरावर हे तथाकथित कवी सोन्याच्या मोलाने आपली माती विकावी अशा खटपटी लटपटी करतात. एखाद्या कवितेचे धृपद म्हणायचे असले तरी त्यासाठी घरोघर जाऊन पोटाची खळगी भरण्याचा उधोग करतात. खरंतर या कवींना अभिजात काव्याचा काहीच गंध नसतो. 'ना अभ्यास, 'ना व्यासंग, ना प्रामाणिक निष्ठा. त्यामुळे रचना करून त्याला लोकांनी काव्य म्हणावे आणि आपला सन्मान करावा अशी त्यांची अपेक्षा असते. केळी आणि दोडका यांचे रूप वेगळे, चव वेगळी, मात्र दोडक्याप्रमाणे असणारे लोक केळीच्या भावाने आपली गणना करावी, अशी अपेक्षा करतात. समाजातील ढोंगी आणि दिखाऊ लोकांच्या स्वार्थी प्रवृत्तीवर संत नामदेवांनी नेमके बोट ठेवले आहे.

Comments
Add Comment

मोक्षाची अनुभूती

ऋतुराज-ऋतुजा केळकर “क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दु:खं जागी करण्या

विचारांचे सामर्थ्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   तुम्ही कुठेही जा तुमच्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. १. विचार २. जीभ ३.

जीवनाचे मूल्यमापन

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य     मानवी जीवन हे केवळ घटनांची मालिका नसून, अनुभवांची, निवडींची, मूल्यांची आणि

कनकन किंडी

भारतीय ऋषी-डॉ. अनुराधा कुलकर्णी कर्नाटकातील एक आचार्य व्यासराय यांचा शिष्यपरिवार खूपच मोठा होता.

क्रियमाण

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   क्रियमाण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असणार. याचे अगदी

घे जवळी, घे जवळी...

ऋतुराज-ऋतुजा केळकर   “मैने बिगाडा हर काम अपना तुने सावरा हर काम मेरा सांचा नाम तेरा...” साजवेळी हे गीत सहजच ओठी