बदलापूरमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; ४०० हून अधिक बांधकामे हटवणार

बदलापूर : नगरपालिका निवडणुकांनंतर बदलापूर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून, अनधिकृत बांधकामांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंबरनाथ–बदलापूर महामार्ग आणि पनवेल महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती व व्यावसायिक गाळ्यांवर आज नगरपालिकेने बुलडोझर चालवला. या अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.


गेल्या काही वर्षांत बदलापूरच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. विशेषतः मुख्य रस्त्यालगत उभारलेली दुकाने, गाळे आणि तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामांमुळे वाहतूक, सौंदर्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.


पालिकेच्या माहितीनुसार, ही कारवाई पुढील ८ ते १० दिवस सलग सुरू राहणार असून, शहरातील सुमारे ४०० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे हटवण्याचा* निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


पालिकेचे मुख्याधिकारी *मारुती गायकवाड* यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई राबवली जात आहे. “अनधिकृत बांधकामांमुळे शहराचा नियोजित विकास खुंटतो. त्यामुळे नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई केली जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, या कारवाईचे शहरातील अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे सार्वजनिक जागा अडवल्या जात होत्या, तसेच वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत होता, अशी नागरिकांची तक्रार होती. मात्र, काही नागरिकांनी ही कारवाई सातत्याने सुरू राहावी आणि भविष्यात पुन्हा अशी बांधकामे उभी राहू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.


यापूर्वी अनेक वेळा कारवाईनंतर काही महिन्यांतच त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रशासन ही मोहीम कितपत प्रभावीपणे राबवते, याकडे संपूर्ण बदलापूरचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा महासागर; मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नगरी अक्कलकोटमध्ये (Akkalkot) गुरुपौर्णिमा उत्सवासाठी (Guru Purnima 2026) जय्यत तयारी

Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान

Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री

Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर मुंबई : राज्यातील वाळू आणि

Satara Suicide : NEET परीक्षेतील अपयशाने खचली! कराडमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

सातारा : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीमुळे देशभरात आंदोलने सुरु होती. नीट पेपरफुटीमुळे आणि परिक्षेतील

Nagpur Rain Alert Update : नागपुरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी : सखल भागात साचले पाणी, सोमलवार शाळेचे मैदान जलमय; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur Heavy Rain) हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.