किश्तवाड जिल्ह्यातील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा कारवाईदरम्यान दशतवाद्यांना कोणताही गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या क्षेत्रातील मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केली आहे.


सुरक्षा दलाने शुक्रवारी राबवलेल्या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सिंहपोरा, चिंगम व चतर या भागातील सहा किमी क्षेत्रात मोबाइल व इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने १८ जानेवारी रोजी या क्षेत्रात मोहीम सुरू केली होती. त्यावेळी मंड्राल-सिंहपोराजवळील सोनार जंगलात दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर ७ जवान जखमी झाले होते. त्यानंतर २२ जानेवारीला माली डाना टॉप व २५ जानेवारी रोजी जनसीर-कांडीवार भागात पुन्हा दहशतवाद्यांशी चकमकी उडाल्या त्यावेळी दहशतवादी जंगलात पसार झाले होते.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि