भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल

विकासाभिमुख आणि व्यवहार्य अर्थसंकल्प


मुंबईच्या उद्योग व विकासवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प


भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत


मुंबई : मोदी सरकारने आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला विकासाभिमुख आणि व्यवहार्य असे संबोधून या अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीच्या उदयोग व विकासवाढीला मोठी चालना मिळणार आहे. आजचा अर्थसंकल्प भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि कोविड-१९ मधून सर्वात वेगाने सावरणारी अर्थव्यवस्था ठरला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष व अंधेरी पश्चिमचे आमदार अमीत साटम यांनी दिली.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी बोलताना आमदार साटम म्हणाले की, अर्थसंकल्पामध्य देशात सात अतिवेगवान रेल्वे काॅरीडरची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई-पुणे हा एक कॉरीडॉर आहे. यामुळे मुंबई व पुणे या दोन मोठ्या शहरातली वाहतूक सुलभ व जलद होणार आहे.


आमदार अमीत साटम यांनी अधोरेखित केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी जमिनीखाली रस्त्याचे जाळे विणणारा पाताळ लोक प्रकल्प घोषित केला आहे. हा महत्त्वाकांक्षी ७० किमी लांबीचा प्रकल्प भूमिगत बोगद्याचे जाळे असून मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणणार आहे. बोगद्यासाठी लागणाऱ्या टनल बोअरिंग मशिनसाठी आपण आयातीवर निर्भर होतो. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात टीबीएम मशिनच्या स्थानिक उत्पादकांना करमाफी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे टीबीएम मशीनवरचे आपले चीन व इतर देशावरचे अवलंबीत्व संपणार असल्याचे आमदार साटम यांनी स्पष्ट केले.


आजच्या अर्थसंकल्पात महिला बचत गटांसाठी SHE मार्ट उभारण्याचे जाहीर केले आहे. याचा स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना मोठा लाभ होईल. मोठ्या शहरांमध्ये १००० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या नगरपालिका बाँडना १०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. बृहन्मुंबई ही आशिया खंडातील मोठी व श्रीमंत महानगरपालिका आहे. या बाँड अनुदानाचा मुंबई महानगरपालिकेला मोठा लाभ होणार असल्याचा दावा आमदार अमीत साटम यांनी केला.


१५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला मोठी आर्थिक मदत केली जाई, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगास (एमएसएमई) विकास इंजिन म्हणून स्थान दिले असून त्यासाठी 7 लाख कोटी रुपये विकास निधी जाहीर केला. या भरघोस निधीमुळे तसेच मुंबईतील उद्योग व विकास वाढीला आणखी चालना मिळणार असल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.


Comments
Add Comment

राज्यसभा हुकलेल्या राहुल शेवाळेंवर लवकरच मोठी जबाबदारी?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरल्याने नाराज

इराणकडून सौदीच्या यानबू बंदरातील समरेफ रिफायनरीवर हवाई हल्ला; जागतिक तेल बाजारात खळबळ

सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यानबू बंदरगाहातील सौदी अरामको आणि एक्सॉनमोबिल यांच्या

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली