भारताची युवा विश्वचषक उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान नेट रन रेटच्या गणितामुळे स्पर्धेतून बाहेर

बुलावायो  : १९ वर्षाखालील विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. पण हा सामना संपण्यापूर्वीच भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, तर भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. नेट रन रेटच्या गणितामुळे भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले आहे.


सुपर सिक्स फेरीतील हा अखेरचा सामना होता. सुपर सिक्समधून दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरी गाठणार होते. ए गटातून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. ब गटातून उपांत्य फेरीतील तिकीट इंग्लंडने ८ गुणांसह पक्के केले होते. पण उपांत्य फेरीत ब गटातून आणखी एक संघ उपांत्य फेरीत पोहचणार होता. या जागेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शर्यत होती.


सामन्यापूर्वी भारताचा सर्वात चांगला (३.३३) नेट रन रेट होता. भारताचे ६ गुण होते, तर पाकिस्तानचे १.४८ नेट रन रेटसह ४ गुण होते. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय आणि नेट रन रेटचे गणित दोन्ही संघांसमोर होते. रविवारच्या  सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला हे लक्ष्य ३३.३ षटकात पूर्ण करणे गरजेचेच होते किंवा किमन ३४.३ षटकापर्यंत जाऊन षटकारासह २५८ धावा करणे गरजेचे होते. भारताला काहीही करून पाकिस्तानला ३५ षटकांहून अधिक काळ फलंदाजी करायला लावायची होती.


अखेर ३५ षटकांपर्यंत पाकिस्तान ४ बाद १६८ धावांपर्यंतच पोहचू शकल्याने भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले. कारण यानंतर पाकिस्तानने विजय मिळवला आणि भारताप्रमाणे ६ गुणांपर्यंत जरी पोहचले, तरी भारताच्या नेट रन रेटला ते मागे टाकू शकणार नाहीत. त्यामुळे भारताचे बी गटातील पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित झाले असून पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपले आहे. या सामन्यात भारतीय संघ ४९.५ षटकात २५२ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताकडून वेदांत त्रिवेदीने ९८ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. तसेच कनिष्क चौहान (३५), आरएस आंब्रिश (२९), वैभव सूर्यवंशी (३०), विहान मल्होत्रा (२१) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ३५ षटकापर्यंत पाकिस्तानकडून हामजा जहूरन ४२ आणि कर्णधार फरहान हुसैनने ३८ धावा केल्या होत्या. उस्मान खानने अर्धशतक केले होते.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या

WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या

FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व

MI VS KKR : मुंबई विरुद्ध केकेआर मध्ये हायव्होल्टेज लढत; प्लेऑफसाठी KKR ला विजय आवश्यक; हार्दिक पांड्याचे पुनरागमन ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज 65 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना Eden Gardens