भारताची युवा विश्वचषक उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान नेट रन रेटच्या गणितामुळे स्पर्धेतून बाहेर

बुलावायो  : १९ वर्षाखालील विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. पण हा सामना संपण्यापूर्वीच भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, तर भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. नेट रन रेटच्या गणितामुळे भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले आहे.


सुपर सिक्स फेरीतील हा अखेरचा सामना होता. सुपर सिक्समधून दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरी गाठणार होते. ए गटातून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघांनी उपांत्य फेरी गाठली होती. ब गटातून उपांत्य फेरीतील तिकीट इंग्लंडने ८ गुणांसह पक्के केले होते. पण उपांत्य फेरीत ब गटातून आणखी एक संघ उपांत्य फेरीत पोहचणार होता. या जागेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शर्यत होती.


सामन्यापूर्वी भारताचा सर्वात चांगला (३.३३) नेट रन रेट होता. भारताचे ६ गुण होते, तर पाकिस्तानचे १.४८ नेट रन रेटसह ४ गुण होते. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय आणि नेट रन रेटचे गणित दोन्ही संघांसमोर होते. रविवारच्या  सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला हे लक्ष्य ३३.३ षटकात पूर्ण करणे गरजेचेच होते किंवा किमन ३४.३ षटकापर्यंत जाऊन षटकारासह २५८ धावा करणे गरजेचे होते. भारताला काहीही करून पाकिस्तानला ३५ षटकांहून अधिक काळ फलंदाजी करायला लावायची होती.


अखेर ३५ षटकांपर्यंत पाकिस्तान ४ बाद १६८ धावांपर्यंतच पोहचू शकल्याने भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले. कारण यानंतर पाकिस्तानने विजय मिळवला आणि भारताप्रमाणे ६ गुणांपर्यंत जरी पोहचले, तरी भारताच्या नेट रन रेटला ते मागे टाकू शकणार नाहीत. त्यामुळे भारताचे बी गटातील पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित झाले असून पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपले आहे. या सामन्यात भारतीय संघ ४९.५ षटकात २५२ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताकडून वेदांत त्रिवेदीने ९८ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. तसेच कनिष्क चौहान (३५), आरएस आंब्रिश (२९), वैभव सूर्यवंशी (३०), विहान मल्होत्रा (२१) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ३५ षटकापर्यंत पाकिस्तानकडून हामजा जहूरन ४२ आणि कर्णधार फरहान हुसैनने ३८ धावा केल्या होत्या. उस्मान खानने अर्धशतक केले होते.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या