Budget 2026 : निर्मला सीतारामन यांनी रचला इतिहास! सलग नवव्यांदा बजेट सादर करत मोडीत काढला 'हा' विक्रम

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण देशाचे लक्ष संसदेकडे लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता लोकसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडून निर्मला सीतारामन एक नवा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत.


अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे 'कर्तव्य भवन' येथे आगमन झाले आहे. एनडीए (NDA) सरकारने १ फेब्रुवारी रोजीच अर्थसंकल्प मांडण्याची सुरू केलेली परंपरा यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी, मध्यमवर्गीय आणि उद्योजकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात संसदेच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होणार असून, भारताच्या भविष्यातील आर्थिक वाटचालीचा आराखडा आज मांडला जाईल.



आज शेअर बाजार सुरू


आज रविवार असूनही दलाल स्ट्रीटवर मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, आज १ फेब्रुवारी रोजी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) हे दोन्ही मुख्य शेअर बाजार पूर्णवेळ व्यवहारांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांना गुंतवणूकदारांना त्वरित प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने हा विशेष निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात वीकेंडला (शनिवार-रविवार) शेअर बाजार सुरू राहण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी २०२५ मध्ये जेव्हा शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला होता, तेव्हा बाजार सुरू होता. अर्थमंत्र्यांच्या घोषणांनंतर बाजारात होणारी चढ-उतार आणि त्यावर गुंतवणूकदारांची प्रतिक्रिया यामुळे आजच्या व्यवहारांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.



निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण


केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या १२ वर्षांतील आर्थिक प्रवासाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या आणि आर्थिक स्थैर्याचा अभाव होता, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील सुधारणांचा पाढा वाचला. "आम्ही सत्तेत आलो तेव्हा राजकोषीय तूट (Fiscal Deficit) मोठ्या प्रमाणात होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आली आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने आर्थिक रचनात्मक सुधारणा आणि दारिद्र्य निर्मूलनावर भर दिला. सामान्यांची क्रयशक्ती (Purchasing Power) वाढवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट राहिले असून, भारताची आयातीवरील निर्भरता कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसमावेशक विकास आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येत आहे.


बातमी अपडेट होत आहे...
Comments
Add Comment

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने