राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाली की नाही ? नेमके काय घडले ?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली. पक्षाचे सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्या हातामध्ये देण्यात आल्याचे विधान भाजपाचे नेते पियुष गोयल यांनी केले. गोयल यांच्या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असा काही निर्णय झालेला नाही अशी स्पष्ट माहिती तटकरे यांनी दिली आहे.


'राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पण पटेल नाही'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! असे ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या ट्वीटला सुनील तटकरे यांनी उत्तर देताना म्हटले की, "राज ठाकरे यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रित बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, आमदारांच्या भावना या लक्षात घेऊन निर्णय घेऊ"


काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन असल्याचे स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टद्वारे दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे.

Comments
Add Comment

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग, मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प

पंतप्रधानांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धापूर्वक पाऊल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची

रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rohit Shetty Mumbai house : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना

अर्थसंकल्पातील 'विकसित भारत ' हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर मुंबई : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने

भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल

विकासाभिमुख आणि व्यवहार्य अर्थसंकल्प मुंबईच्या उद्योग व विकासवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प भाजपचे मुंबई

Budget 2026: हा युवा शक्तीचा बजेट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२६ जाहीर केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र

सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ वापरणाऱ्यांना फटका बसणार, काय आहे नवीन करप्रणाली?, जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई: सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला वापरणाऱ्यांना आजपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र