Budget 2026: बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय ?

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही निर्मला सीतारमन यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. यावर्षीचा बजेट हा युवकांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय व्यावसायिक, विशेषतः महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उद्योगांसाठी अनेक प्रस्तावांची घोषणा करण्यात आली.

या घोषणेअंतर्गत पशुपालकांना सुलभ कर्ज आणि अनुदान दिले जाईल. तसेच पशुधन उत्पादक संघटनांच्या (LPOs) निर्मितीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या सामूहिक ताकदीला बळकटी दिली जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी मागे राहू नये म्हणून सरकारने 'भारत विस्तार' नावाचे बहुभाषिक एआय (AI) टूल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या योजना :

- पशूपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान
- काजू, कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार
- ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार
- दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार
- चंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणार; नारळ संशोधन केंद्र स्थापन करणार
- ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवणार
- चंदन लागवडीला प्रोत्साहन
- आयातीवर अवलंबित्व कमी करणार
- मत्स्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार
- सागरी किनारपट्टी आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना मदत करणार
Comments
Add Comment

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

Iran-US-Israel War : चीनकडून सर्व देशांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या आणि हॉर्मुज सामुद्रधुनीवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनने सर्व

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

मुंबईत गॅस तुटवडा नाही, महापौरांनी केले 'हे' मुंबईकरांना आवाहन

मुंबई: मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र निर्माण केले जात असून ही अफवा केवळ काँग्रेस आणि

पाकिस्तानने केला अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० लोकांचा मृत्यू २५० हून अधिक जखमी; राशिद खानकडून संताप व्यक्त

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर