Budget 2026 : दही - साखर भरवून राष्ट्रपती मुर्मू यांनी दिल्या अर्थमंत्री सीतारमण यांना शुभेच्छा

नवी दिल्ली: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग नव्यांदा देशाचा बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सितारमण यांना आपल्या हाताने दही - साखर भरवून शुभेच्छा दिल्या आहेत. कुढल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दही साखर खाऊन करतो. म्हणूनच दही - साखर भरवून राष्ट्रपती यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा दिल्या.


अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत जाण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी बजेट सादर करण्यासाठी त्यांनी एक आकर्षक कांजीवरम साडी निवडली आहे. ही साडी तामिळनाडूमधून आली आहे. लवकरच तामिळनाडू येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.





एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ :


अर्थसंकल्पापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून एलपीजी ग्राहकांना धक्का दिला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.


रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढणार :


व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील ढाबे आणि इतर व्यावसायिक ठिकाणी केला जातो. त्यामुळे हॉटेल्स-रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. जानेवारीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १११ रुपयांनी वाढवण्यात आली होती.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या अस्थी नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

मुंबई: दि.१ फेब्रुवारी - आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प : मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या

आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या