नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, भारताच्या सेवा क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी सरकार एक नवीन समिती स्थापन करेल. ही समिती सेवा क्षेत्रात एआय कसा बदल घडवत आहे आणि त्याच्या भविष्यातील शक्यता आणि आव्हाने काय असू शकतात याचे मूल्यांकन करेल.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, ही समिती सेवा क्षेत्रातील वाढीची क्षमता वाढवणारी क्षेत्रे ओळखेल. तसेच रोजगार, उत्पादकता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने घोषणाबाजी करण्याऐवजी विकासांवर लक्ष केंद्रित केले आहे. आपला देश विकसित भारत बनण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत राहील. बजेटपूर्वी, देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांना आशा होती की सरकार एआय इकोसिस्टम, नवोन्मेष आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी ठोस पावले उचलेल.
एकंदरीत, सरकारच्या या पावलावरून असे दिसून येते की येणाऱ्या काळात, भारताच्या सेवा क्षेत्राची दिशा आणि स्थिती निश्चित करण्यात एआय AI महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.