राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही पाटील चालेल, पण पटेल नको

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू असून आज दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असं मत राज ठाकरेंनी मांडलं आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. अशातच सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आल्याने पक्षसंघटनेला त्या कितपत वेळ देऊ शकतील, असा मुद्दा पुढे करत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही." दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडतात, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुढे जाते का, पक्षाला नवं नेतृत्व मिळणार की प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होणार, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले; महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची माहिती

मुंबई: ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची

Madhya Pradesh: अनुपपूरमध्ये मोठा अपघात; तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील अनुपपूर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेत एका

तुम्ही एसी आणि इंडक्शन एकाच वेळी वापरत असाल तर सावधान; तुम्हाला दंड होऊ शकतो

मुंबई: एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे लोकांनी आपल्या घरात इंडक्शन कुकटॉप वापरायला सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात

Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर' सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार

अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड