राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही पाटील चालेल, पण पटेल नको

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी सुरू असून आज दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असं मत राज ठाकरेंनी मांडलं आहे.


अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. अशातच सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आल्याने पक्षसंघटनेला त्या कितपत वेळ देऊ शकतील, असा मुद्दा पुढे करत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही." दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडतात, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुढे जाते का, पक्षाला नवं नेतृत्व मिळणार की प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होणार, हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या अस्थी नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

मुंबई: दि.१ फेब्रुवारी - आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प : मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या

आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या