होत्याच झालं नव्हतं... धावती लोकल पकडायला गेली अन्.....

बदलापूर : सकाळची प्रचंड गर्दीची वेळ आणि प्रत्येक जण वेळेवर लोकल पकडून कामावर वेळेवर जाणयासाठी धावपळ करत असतो. पण हीच धावपळ, हीच गर्दी एका नवविवाहितेच्या जीवावर बेतली आहे.



नेमकं घडल काय ?


सकाळची ८ वाजून ११ मिनिटांचीची सीएसएमटी ट्रेन आणि बदलापूर स्टेशनवर जमलेली प्रचंड गर्दी, प्रत्येक जण ट्रेन पकडण्यासाठी घाई करत होतेआणि अश्यातच २८ वर्षीय चेतना चंद्रशेखर देवरुखकर ही तरुणी सुद्धा ट्रेन पकडण्याच्या धावपळीत होती, काही कारणास्तव ट्रेन पकडायला तिला उशीर झाला. अन् ट्रेन स्टेशनवरून सुटली, तीच सुटलेली ट्रेन पकडण्यासाठी चेतना प्रयत्न करत होत्या. याच प्रयत्नात त्यांच्या तोल गेला आणि त्या ट्रेनखाली आल्या यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.


चेतना देवरुखकर यांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्या बदलापूर जुवेळी येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होत्या. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनानाची बातमी समजताच देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे.


मुंबईत गर्दी वाढत चालल्याने ट्रेनला ही प्रचंड गर्दी असते. अनेकजण ट्रेनला लटकतात जीव धोक्यात घालून धावती लोकल पकडतात. आणि याच धावपळीत याच प्रवासात अनेकजण आपल्या जीवाला मुकतात. अति घाई संकटात नेई, एक ट्रेन चुकली तर चुकूदेत आपल्या आयुष्य लाखमोलाचा असत. याचे भान प्रवाशांनी राखणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध