स्थानिक स्वराज्य संस्थांनी १७६ कोटी थकवले

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीकडून थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावला जात असतानाच अलिबाग नगरपालिका, जिल्हा परिषद आणि अनेक ग्रामपंचायतींनी एमआयडीसीची १७६ कोटींहून अधिक रुपयांची पाणीपट्टी थकविल्याची बाब समोर आली. परिणामी पाणीपुरवठा बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्वात मोठी थकबाकी अलिबाग नगर परिषदेची आहे. १९९६ पासून अलिबाग नगरपरिषदेसाठी जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होत आहे. त्या वेळेपासून एमआयडीसीला देय असलेली रक्कम थकीत राहिली आहे. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. या ग्रामपंचायतींकडून थकीत रक्कम वाढत चालली आहे.


अलिबागमधील औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केल्यानंतर उरणारे पाणी शहर आणि गावांना उपलब्ध करून दिले जात असते. यासाठी ठरावीक रक्कम एमआयडीसी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाणी बिलांच्या स्वरूपात आकारणी करते. मात्र ही रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळेवर भरली जात नसल्याची बाब आता समोर आली आहे. अलिबाग नगरपालिकेसह ४० ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांच्याकडून १७६ कोटी रुपये एमआयडीसीला येणे बाकी आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणी बिलांच्या थकबाकीची रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भरली जात नसल्याची बाबही यानिमित्ताने समोर आली आहे. पाणीपट्टीची रक्कम मोठी असल्याने याची आता चर्चा होऊ लागली आहे.


कोट्यवधींची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायती आणि नगरपालिका पोयनाड, वेश्वी, थळ, चेंढरे, आंबेपूर, सोगाव, कामार्ले, चरी, कुरुळ, खंडाळे, नागोठणे, शहाबाज या प्रमुख ग्रामपंचायतींसह अलिबाग नगरपालिकेला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. आम्ही थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायती, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाठपुरावा करrत आहोत, पण प्रतिसाद मिळत नसल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता सुभाष कुंभार यांनी सांगितले, तर अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग नगरपालिकेची एमआयडीसीला देय असलेली रक्कम फार पूर्वीपासूनची आहे. त्यावर व्याज वाढत गेल्याने ही रक्कम वाढत गेली; परंतु अलीकडच्या कालावधीत दर महिन्याला जी रक्कम आकारली जाते, ती नियमित भरली जात असल्याचे सांगितले.


एमआयडीसीचे थकबाकीदार
अलिबाग नगरपालिका - ३१ कोटी ९७ लाख
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण – ४२ कोटी ४ लाख
जिल्हा परिषद - १५ कोटी
५० लाख
३६ ग्रामपंचायती - ८५ कोटी ४४ लाख
सार्वजनिक बांधकाम ९० लाख

Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या