सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.


मूळतः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या अचानक झालेल्या तारखेतील बदलामुळे खेड तालुक्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अडचणीत सापडले आहेत. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) नियोजित असून या परीक्षेसाठी अनेक शिक्षक परीक्षार्थी आहेत. मात्र त्याच कालावधीत त्यांना निवडणूक कर्तव्य देण्यात आल्याने या शिक्षकांना अत्यंत महत्त्वाच्या सीटीईटी परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले की, सीटीईटी ही शिक्षकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून निवडणूक प्रक्रियेमुळे कोणत्याही शिक्षकाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यामुळे तहसीलदार यांनी या विशेष परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ७ व ८ फेब्रुवारी रोजी ज्यांची सीटीईटी परीक्षा आहे, अशा शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देते वेळी सचिव धर्मपाल तांबे, संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर, सल्लागार परशुराम पेवेकर यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.

कोकणच्या विकासासाठी निधीचा धडाका; गॅस तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका - गृहमंत्री योगेश कदम

रत्नागिरी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत कोकणचा विकास, गॅस पुरवठा आणि राजकीय

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन

कोकणच्या लाल मातीला लागली शिमगोत्सवाची चाहूल

ग्रामदैवतांच्या पालख्या, पारंपरिक नृत्यप्रकार, दशावतारी नाट्यप्रयोगांची तयारी अंतिम टप्प्यात रत्नागिरी :

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत