Budget 2026-27 : रविवारी बजेट; शेअर बाजार सुरू असणार की बंद? जाणून घ्या

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. देशाचा अर्थसंकल्प रविवारी जाहीर होत असल्याने उद्या शेअर बाजार सुरू असणार की बंद याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र रविवार असूनही बजेट सदरीकरणाच्या दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे इतिहासात दुसऱ्यांदाच रविवारच्या दिवशी शेअर मार्केट सुरू असणार आहे.


रविवारी शेअर मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजार समित्यांकडून घेण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणतः शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शेअर मार्केटचे व्यवहार हे बंद असतात. मात्र मागच्या वर्षी १ फेब्रुवारी २०२५ शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होतं. त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा शनिवार असूनही शेअर बाजारातले व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे यंदाही रविवार असूनदेखील शेअर मार्केट सुरू राहणार असल्याचे दोन्ही बाजार समित्यांनी जाहीर केले आहे.


यामुळे उद्या बजेटच्या दिवशी रविवार असूनही ट्रेडिंग करता येणार आहे.  नेहमीच्या बाजार वेळेनुसार म्हणजेच ९:१५ ते ३:३० पर्यंत ट्रेडिंग करता येणार आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी विकास दर ७.० टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, देशांतर्गत सुधारणा आणि सरकारी गुंतवणुकीमुळे जागतिक आव्हाने असूनही देशाच्या अर्थव्यवस्थेची अंतर्गत ताकद सतत वाढताना दिसत आहे.
Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला