चौपदरीकरणामुळे चर्चेत आलेल्या मीरा भाईंदर उड्डाणपुलाची वाहतूक पोलिसांनी केली पाहणी, सुचवले बदल

मीरा रोड : दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेमुळे मीवर भाईंदर येथे उभारण्यात आलेल्या तिसरा दुमजली उड्डाणपूल रचनेमुळे वादात अडकला होता.अखेर वाहतूक पोलिस आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. चार मार्गिकेचा पूल पुढे थेट दोन मार्गिकेचा करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होईलच शिवाय भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मीरा-भाईंदर परिसरात मेट्रो-९ चे खांब उभारल्यानंतर रस्त्यांची रुंदी कमी झाली असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने परिसरात तीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी दोन पूल आधीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तर जुना पेट्रोल पंप ते फाटक मार्गावरील आझाद मैदानदरम्यानचा सुमारे १८०० मीटर लांबीचा तिसरा पूल बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहे.


मात्र, या पुलाची रचना चार मार्गिकांवरून अचानक दोन मार्गिकांमध्ये येत असल्याने सोशल मीडियावरून तीव्र टीका सुरू झाली. वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत, अपघातांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पुलाची सखोल पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.


पाहणीनंतर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुभाजकांची रचना, दिशादर्शक व सूचना फलक, वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना आणि मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी चिन्हांकन यांचा त्यात समावेश आहे. या सूचनांची अंमलबजावणी केल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.


एमएमआरडीएने पुलाच्या रचनेत कोणताही धोका नसल्याचा दावा केला असून, भविष्यात भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणीसाठी विस्तार करण्याच्या दृष्टीने ही रचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, नागरिकांकडून होणाऱ्या टीकेनंतर आता अतिरिक्त सुरक्षात्मक उपायांवर भर दिला जात आहे.


सर्व अंतर्गत कामे आणि वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर हा दुमजली उड्डाणपूल फेब्रुवारी अखेरीस वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

पवारांसाठी प्रियांका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याची संजय राऊतांची चाल; भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र

मुंबई : मराठीचा मुद्दा उपस्थित करून प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट करण्याची संजय राऊत

Rajya Sabha Election : राज्यसभेत ६ जागांवर महायुतीचा विजय पक्का - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- सातव्या जागेबाबत विरोधकांनी निर्णय घ्यावा मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण

Beed: बीडमधील संतापजनक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर चक्क मंडपात

बीड: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झाली आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Board of Peace: ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये चीन आणि रशियाचा समावेश ?

- चीन आणि रशियाला ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सामावून घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष