रिलायन्स समूहाची १८०० कोटींची मालमत्ता जप्त

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरण


नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून १,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली. या कारवाईसह या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य आता अंदाजे १२,००० कोटी रुपये झाले आहे. ही कारवाई रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), येस बँक घोटाळा तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित कथित फसवणुकीच्या प्रकरणांशी संबंधित आहेत.


नवीन जप्तींमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे बीएसईएस यमुना पॉवर, बीएसईएस राजधानी पॉवर आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमधील शेअरहोल्डिंगचा समावेश असल्याचे ईडीने म्हटले आहे. व्हॅल्यू कॉर्प फायनान्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड यांच्याकडे असलेल्या १४८ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि १४३ कोटी रुपयांच्या मिळकती तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या असल्याचे ईडीने सांगितले. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अंगराई सेथुरामन यांच्या नावावर असलेले एक निवासी घर आणि दुसरे वरिष्ठ कर्मचारी पुनीत गर्ग यांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडदेखील जप्त करण्यात आले आहेत. या जप्तीचे एकूण मूल्य १,८८५ कोटी रुपये असल्याचे ईडीने सांगितले.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकच्या धरणांतील जलसाठा चिंताजनक पातळीवर; शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार

Nashik : नाशिक जिल्ह्यावर यंदा एल निनोचा (El Nino) प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पावसाच्या लांबलेल्या प्रतीक्षेमुळे

Pratap Sarnaik's Operation Tiger : मंत्री प्रताप सरनाईक यांची मध्यस्थी... 'ऑपरेशन टायगर' फत्ते

मुंबई : उबाठा गटाचा सहावा खासदार राजी होत नसल्याने 'ऑपरेशन टायगर' रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची तयारी पूर्ण, 9 ठिकाणी केंद्रे

Nashik Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीसाठी अवघा १ दिवस शिल्लक राहिला आहे. दरम्यान, नाशिक विधान परिषद स्थानिक

Drinking Water Policy : ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नवे धोरण; दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारणार

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची वाटचाल ठप्प! महाराष्ट्रात आणखी काही दिवस उकाड्याचा तडाखा; मुंबईकरांना पावसासाठी करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई : राज्यभरात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. नैऋत्य मोसमी पावसाची

Delhi Police : राजधानीत दहशतवादी कट उधळला! ISI समर्थित नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; शस्त्रे-ड्रग्ज तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे.