राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत लवकरच निर्णय - प्रफुल्ल पटेल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भवितव्याबाबत तसेच अजित पवार यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होण्याची गरज व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्या खात्यांबाबत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित निर्णयांबाबत अनिश्चितता कायम राहू नये, ही आमची भूमिका आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि जनतेच्या भावना लक्षात घेता विलंब न करता ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आम्ही आमची भूमिका मांडली आहे.

ते पुढे म्हणाले की, अजितदादा हे अनुभवी नेते होते, त्यांनी राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यांबाबत लवकर निर्णय होणे हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही. येत्या काळात यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ आणि उत्पादन शुल्क ही खाती राष्ट्रवादीकडे कायम ठेवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

नरेश अरोरा सुनेत्रा पवारांच्या भेटीला

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजकीय सल्ल्यासाठी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावले असून, अरोरा हे दुपारी सुनेत्रा पवार यांच्या भेटीला बारामतीला पोहोचले.


Comments
Add Comment

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील

मुंबईतील काही परिसर फेरीवालामुक्त ठेवणारच; महापालिका आयुक्तांनी दिले तीव्र कारवाईचे निर्देश

मुंबई: मुंबई महानगराची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे

मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्‍या विपुल दोशी

मुंबई: मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची यांची सोमवारी २३ फेब्रुवारी

तीन वर्षांनंतर प्रथमच स्वीकारणार स्थायी समिती अध्यक्ष स्वीकारणार महापालिका अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प येत्या बुधवारी मांडला जाणार असून तब्बल तीन वर्षांनतर

Navnath Ban: नगरसेवक नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा

Trending: दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा

मुंबई: आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे २०२३ बॅचच्या दोन तरुण