Ajit Pawar's Plane Crash : अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची सीआयडी चौकशी; राज्य सरकारचे आदेश

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार असून, अपघातामागची नेमकी कारणे शोधण्यावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश न देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी (दि. २८) झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नि दिला. ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून, शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा पाळण्यात आला.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेची चौकशी सीआयडीकडे सोपवली असून, बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. याआधीच फॉरेन्सिक पथकाने अपघातस्थळी भेट देत विविध नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८.१८ वाजता प्रथमच बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात आले. त्या वेळी वैमानिकांना सध्या वाऱ्याचा वेग कमी असून दृश्यमानता सुमारे ३ हजार मीटर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पायलटने विमान रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे सांगितले; मात्र रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचेही त्यांनी कळवले. रनवे दिसू लागल्यानंतर माहिती देतो, असे पायलटने एटीसीला सांगितले होते.

सकाळी ८.४३ वाजता रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी पूर्णतः सज्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या संपूर्ण घटनेचा तपशीलवार तपास आता सीआयडीकडून करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा