चिपळुणात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी, उबाठा सेनेत तिरंगी लढत

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायती समितीच्या एकूण २७ जागांसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तालुक्यात शिवसेना -भाजप युती, राष्ट्रवादी आणि उबाठा सेना अशी तिरंगी लढत होणार आहे. जि.प. ९ जागांसाठी २८, तर पं. स. १८ जागांसाठी ५५ असे एकूण ८३ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या योगेश खांडेकरांचा अपक्ष अर्ज राहिल्याने उमरोली गटात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. उबाठा सेनेच्या तीन अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने शिरगांव, अलोरे गटात पक्षावर उमेदवारच नसल्याची नामुष्की ओढवली.


तालुक्यात एकूण २७ जागांसाठी भाजप १०, तर शिंदेसेना १८, राष्ट्रवादी सर्व २८, ठाकरे सेना २२ जागा लढवत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस अवघ्या एकेक जागा लढवत असून बसपा, वंचितनेही दोन उमेदवार उभे केले. या निवडणुकीत उबाठातर्फे तालुक्यातील मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात सर्वच ठिकाणी उमेदवार रिंगणात असले तरी चिपळूणच्या अर्ध्या भागात मात्र या पक्षाला सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यातच मंगळवारी शिरगांव गट आणि गण तसेच पिंपळी खुर्द गणातील तीनही अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी पक्षाचा उमेदवारच राहिलेला नाही.


शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने कोकरे गटातून किशोर घाग, तर उमरोली गट भाजपला सोडला गेल्याने नाराज झालेल्या सेनेच्या योगेश खांडेकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. मात्र घाग यांनी अर्ज मागे घेतला, तर खांडेकर रिंगणात कायम राहिले आहेत.

Comments
Add Comment

Ratnagiri : रत्नागिरीत वादळाने विद्युतपुरवठा विस्कळित

रत्नागिरी : रत्नागिरीत आज संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची दाणादाण उडाली. यावर्षी

Pramod Jathar : कोकणात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे

रत्नागिरी : भविष्यात संपूर्ण कोकणात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट व भक्कम करण्याचा निर्धार पक्षाने केला

HSC Rajapur Result 2026 : राजापूरची झळाळती कामगिरी! ‘धवल यश’ परंपरा कायम”

राजापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक