चिपळुणात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी, उबाठा सेनेत तिरंगी लढत

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायती समितीच्या एकूण २७ जागांसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तालुक्यात शिवसेना -भाजप युती, राष्ट्रवादी आणि उबाठा सेना अशी तिरंगी लढत होणार आहे. जि.प. ९ जागांसाठी २८, तर पं. स. १८ जागांसाठी ५५ असे एकूण ८३ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या योगेश खांडेकरांचा अपक्ष अर्ज राहिल्याने उमरोली गटात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. उबाठा सेनेच्या तीन अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने शिरगांव, अलोरे गटात पक्षावर उमेदवारच नसल्याची नामुष्की ओढवली.


तालुक्यात एकूण २७ जागांसाठी भाजप १०, तर शिंदेसेना १८, राष्ट्रवादी सर्व २८, ठाकरे सेना २२ जागा लढवत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस अवघ्या एकेक जागा लढवत असून बसपा, वंचितनेही दोन उमेदवार उभे केले. या निवडणुकीत उबाठातर्फे तालुक्यातील मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात सर्वच ठिकाणी उमेदवार रिंगणात असले तरी चिपळूणच्या अर्ध्या भागात मात्र या पक्षाला सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यातच मंगळवारी शिरगांव गट आणि गण तसेच पिंपळी खुर्द गणातील तीनही अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी पक्षाचा उमेदवारच राहिलेला नाही.


शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने कोकरे गटातून किशोर घाग, तर उमरोली गट भाजपला सोडला गेल्याने नाराज झालेल्या सेनेच्या योगेश खांडेकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. मात्र घाग यांनी अर्ज मागे घेतला, तर खांडेकर रिंगणात कायम राहिले आहेत.

Comments
Add Comment

संगमेश्वर तालुक्यात तीन जि. प. गटांत होणार हायहोल्टेज लढती

साडवली गटात माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची प्रतिष्ठा पणाला नीलेश जाधव देवरूख : जिल्हा परिषद व पंचायत

सीटीईटी परीक्षार्थी शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

खेड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड यांच्यावतीने ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी परीक्षा

गुहागरात युती विरुद्ध उबाठा लढत रंगणार

आशिष कारेकर गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद व १० पंचायत

अपघातात जखमींना मिळणार कॅशलेस उपचार

प्राण वाचवणाऱ्या मदतनीसालाही २५ हजार रुपये रोख बक्षीस रत्नागिरी : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी

रत्नागिरी जिल्ह्यावर मळभ व पावसाचे सावट; आंबा-काजू उत्पादन धोक्यात

रत्नागिरी  : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. जिल्ह्यात पावसाचे

मंडणगडमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीने वाढवली निवडणुकीची उत्कंठा

मंडणगड : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना ६-० असा