ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तर ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची बातमी समजताच त्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने, महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्याप शासनाकडून कोणतेही अधिकृत निर्देश न आल्याने निवडणूक वेळापत्रक कायम राहण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.


गेली तीन वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ५५ टक्के इतके मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्के कमी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी एकूण ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामुळे १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी शरद पवार गट १२, राष्ट्रवादी अजित पवार गट ९, एमआयएम ५, शिवसेना उबाठा १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत.


ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढविली असली तरी, शिंदेच्या शिवसेनेकडे सत्तास्थापनेइतका बहुमताचा आकडा असल्याने त्यांच्या पक्षाचा महापौर होईल, अशी शक्यता आहे.


मागील आठवड्यात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवगार्साठी आरक्षित झालेल्या या पदासाठी शिवसेना शिंदे गटातून सात जणांची नावे पुढे आली आहेत. या सातपैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच, महापौर पदासाठी ३ फेब्रुवारी रोजी निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी ३० जानेवारी रोजी अर्ज भरण्याची मुदत आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना घडली.


यामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शासनाकडून याबाबत कोणतेही निर्देश आलेले नसल्यामुळे या निवडणुका वेळेतच होण्याचा अंदाज प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे. तसेच शासनाकडून निर्देश आले तर मग निवडणुका लांबणीवर पडू शकतात, असेही प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले

ठाण्यात पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल; ३० एप्रिलपर्यंत काही मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे