राजापुरात शिवसेना विरुद्ध उबाठा थेट संघर्ष

संतोष मोंडे राजापूर : राजापूर तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणारी 'मिनी मंत्रालये' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून,आता खरी चुरस गावकुसातील प्रचारात पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट संघर्ष पाहायला मिळत असून, विकासाचे मुद्दे आणि राजकीय वर्चस्व या भोवतीच ही निवडणूक फिरताना दिसत आहे.


राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणासाठी निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या सहा गणांपैकी पाच गणात शिवसेना विरुद्ध उबाठा यांच्यात दुरंगी लढत होत आहे. तर कातळी गणात तिरंगी लढत होत आहे. मात्र बारा पंचायत समिती गणात सहा ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. तर सहा ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होताना पाहायला मिळत आहे.


राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत राजापूर वगळता जिल्ह्यात महायुतीने सत्ता मिळविण्यात यश मिळविले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या वडदहसोळ गटातून प्रतीक मटकर (शिवसेना) विरूध्द राजेश चव्हाण (उबाठा) तर तळवडे गटातून सिद्धाली मोरे (शिवसेना) विरुद्ध समिक्षा चव्हाण (उबाठा) अशी दुरंगी लढत होत आहे. त्याचप्रमाणे जुवाठी गटातून रमेश सूद (शिवसेना) विरूध्द दिनेश जैतापकर (उबाठा) व धोपेश्वर गणातून प्रकाश कुवळेकर (शिवसेना) विरुद्ध अभिजीत तेली (उबाठा), तर साखरीनाटे गटातून कोमल नवाळे (शिवसेना) विरुद्ध नलिनी शेलार (उबाठा) अशी चुरशीची लढत होत आहे. कातळी गटातून सोनाली ठुकरूल (शिवसेना) व लक्ष्मी शिवलकर (उबाठा), सावित्री कणेरी (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे.

Comments
Add Comment

चिपळुणात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी, उबाठा सेनेत तिरंगी लढत

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायती समितीच्या एकूण २७ जागांसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज मागे

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

रत्नागिरी जिल्हयातील ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा

महायुतीची वर्चस्वासाठी तर महाविकास आघाडीची अस्तीत्वासाठी लढाई  नरेंद्र मोहिते रत्नागिरी : तब्बल आठ वर्षांनी

दावोसमध्ये कोकणासाठी तीन लाख कोटींचे अकरा करार

रत्नागिरी : दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३७ कोटी २७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून ४३ लाख रोजगार उपलब्ध

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपचे चिपळूणमधील उमेदवार जाहीर

जि.प.साठी तीन, तर पं.स. साठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात भाजपचे नेते माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत