एका कार्यक्षम पर्वाचा अंत: ‘प्रशासकीय शिस्त आणि जनसामान्यांचा आधार हरपला’;

मंत्री नितेश राणे यांच्याकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली


कणकवली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या निधनाने जवळपास चारहून अधिक दशके महाराष्ट्राच्या समाजकारणात सेवा देणारे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.


अजितदादांच्या कार्याचा गौरव करताना नितेश राणे म्हणाले की, प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सहकार क्षेत्राची जाण, निर्णयक्षमता आणि कामातील शिस्त तसेच जनसामान्यांसाठी अखंड झटण्याची वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, दाखवलेली कार्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव ही असंख्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच पथदर्शी ठरेल.


मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, अजितदादांचे विचार, कार्य आणि त्यांच्या नेतृत्वाचा ठसा हा महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासावर कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच या दुःखातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी ईश्वरचरणी केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते