एका कार्यक्षम पर्वाचा अंत: ‘प्रशासकीय शिस्त आणि जनसामान्यांचा आधार हरपला’;

मंत्री नितेश राणे यांच्याकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली


कणकवली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या निधनाने जवळपास चारहून अधिक दशके महाराष्ट्राच्या समाजकारणात सेवा देणारे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.


अजितदादांच्या कार्याचा गौरव करताना नितेश राणे म्हणाले की, प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सहकार क्षेत्राची जाण, निर्णयक्षमता आणि कामातील शिस्त तसेच जनसामान्यांसाठी अखंड झटण्याची वृत्ती यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, दाखवलेली कार्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव ही असंख्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच पथदर्शी ठरेल.


मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, अजितदादांचे विचार, कार्य आणि त्यांच्या नेतृत्वाचा ठसा हा महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासावर कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच या दुःखातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी ईश्वरचरणी केली आहे.

Comments
Add Comment

भारतात किती आहे LPG चा साठा ? दररोज किती आवश्यक आहे आणि आपली व्यवस्था समजून घ्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे भारतासह जगभर तेल आणि

इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

'केवळ जीएसटी परताव्यावर अवलंबून न राहता ठोस उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा'

आमदार निलेश राणे यांचे अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण; महसुली तुटीवर व्यक्त केली चिंता मुंबई : महाराष्ट्राचा

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय