हवाई दलाने घेतला बारामती विमानतळाचा ताबा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर गुरुवारी बारामतीत होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत. ही गंभीर परिस्थिती आणि हवाई सुरक्षेची गरज ओळखून महाराष्ट्र सरकारच्या तातडीच्या विनंतीनंतर भारतीय वायुसेनेने बारामती विमानतळाचा ताबा घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक मुख्यमंत्री विमानाने किंवा हेलिकॉप्टरने बारामतीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षित लँडिंगची जबाबदारी आता पूर्णपणे वायुसेनेकडे असणार आहे.


पुण्यातील लोहेगाव वायुसेना तळावरून हवाई वाहतूक नियंत्रण तज्ज्ञांचे एक विशेष पथक तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहे. या पथकाने आपल्यासोबत अत्यावश्यक तांत्रिक उपकरणे आणि संवाद यंत्रणा आणली असून, बारामती विमानतळावर 'इमर्जन्सी एअर ट्रॅफिक कंट्रोल' सेवा सुरू केली आहे. बारामतीमध्ये कायमस्वरूपी रडार किंवा आधुनिक एटीसी नसल्याने, वायुसेनेने आपली फिरती यंत्रणा बसवून विमानांच्या येण्या-जाण्यावर नियंत्रण स्थापित केले आहे. विमान आणि जमिनीवरील नियंत्रण कक्ष यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी विशेष वारंवारतेची उपकरणे कार्यान्वित केली आहेत.


स्थानिक प्रशासनाशी समन्वय


वायुसेनेचे हे पथक स्थानिक प्रशासन आणि नागरी हवाई उड्डाण विभागाच्या समन्वयाने काम करत आहे. बारामती विमानतळाचा परिसर आता एका लष्करी तळाप्रमाणे सुरक्षित करण्यात आला असून, प्रत्येक हालचालीवर वायुसेनेचे बारीक लक्ष आहे.

Comments
Add Comment

Fighter Jet Emergency Landing Pune : पुण्यात लढाऊ विमानाचे अचानक लँडिंग; करावे लागले चक्क विमानतळ बंद; नेमकं काय घडलं त्या रात्री?

पुणे : विमानाचा अपघात आता रस्ते अपघातासारखा सर्वसाधारण झालाय. काल पुण्याच्या धावपट्टीवर रात्री एक लढाऊ विमानाचे

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने