मराठी न शिकविणाऱ्या शाळांची होणार तपासणी

अहवाल सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना निर्देश


मुंबई : महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य असतानाही आयसीएसई, सीबीएसई आणि आयबी बोर्डाच्या शाळांसह काही खासगी शाळांमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात मराठी न शिकविणाऱ्या शाळांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केली होती. याची गंभीर दखल घेत अशा शाळांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.


राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्यापन सक्तीचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचनाही जारी केली होती. या अधिसूचनेच्या आधारे शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी करीत सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करण्याची सूचनाही केल्या. मात्र त्याकडे अनेक शाळांचे दुर्लक्ष सुरु असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला निवेदन देत याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली होती. या निवेदनाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तालय कार्यालयाला यासंदर्भात त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषा न शिकविणाऱ्या शाळांची तपासणी करून त्यासंदर्भातील स्वयंस्पष्ट अहवाल राज्य सरकारला सादर करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र