नॅशनल पार्क बंद : आदिवासींच्या घरावर बुलडोझर, आंदोलकांनी केली दगडफेक

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईचा विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाने मोठी गर्दी करत पोलिसांवर दगडफेक केली. या सगळ्या गोंधळामुळे आज म्हणजेच मंगळवार २७ जानेवारी रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उद्यानाच्या मुख्य दारावर बॅरिगेटिंग केले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.


जनतेच्या निषेधानंतर, पोलिस पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिस कारवाईचा निषेध करण्यात महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने असल्याचे समोर आले आहेत. जनतेच्या तीव्र निषेधाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा पोलिस पथक मागे हटू लागले तेव्हा काही लोक दगड उचलताना दिसले. घटनेदरम्यान दगडफेकही झाली. परिणामी, बेकायदेशीर कब्जा हटवता आला नाही.






नेमकं प्रकरण काय ?

१९९५ च्या आधीपासून राहणाऱ्या आदिवासींना संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये राहण्यास परवानगी आहे. त्यानंतर राहायला आलेल्या आदिवासींना घरे देऊन त्यांना पुनर्विकासाचा लाभ मिळाल्याचे प्राशाशणाचे म्हणणे आहे. मात्र, असं असूनही पुन्हा एकदा काही जणांकडून अतिक्रमण करण्यात आले आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


या सर्व प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की; "बोरिवलीत काही घटकांना घरं दिलीत, काहींना राहिली आहेत. यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यासाठी बैठक आहे, मला दगडफेकीसंदर्भात माहिती नाही त्यासंदर्भात मी माहिती घेतो. नॅशनल पार्क हा अतिशय सेन्सेटिव्ह विषय आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झोपडपट्टी काढण्याचे हे आदेश देण्यात आले आहेत."

Comments
Add Comment

राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून,

नवी मुंबई विमानतळाला मुंबई विमानतळाशी मेट्रोने जोडणार

महायुती सरकारचा निर्णय; 'मेट्रो-८'च्या जोडणीस मान्यता, २२ हजार ८६२ कोटींचा खर्च अपेक्षित मुंबई : जगातील प्रमुख

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

मुखमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे निर्दश समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर - गोंदिया, भंडारा -

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची "चार्जिंग!”

ईव्ही स्थानकांना प्राधान्य देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश मुंबई : बदलत्या काळाची चाहूल

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे

प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला गालबोट; स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

सोमवार २६ जानेवारी रोजी स्पीकर कोसळून एका तीन वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रोळी