राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.


केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा थेट लाभ राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.


मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, सन २०२५-२६ या हंगामासाठी महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तुरीची खरेदी ८,००० रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने केली जाणार आहे. या खरेदीसाठी २० जानेवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.


ही खरेदी प्रक्रिया नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून, त्यासाठी राज्यभरात ९३४ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.यावर्षी राज्यातील तूर उत्पादनाचा अंदाज १३.५१ लाख मेट्रिक टन इतका आहे. तसेच मागील हंगामात राज्यातील ८५ हजार शेतकऱ्यांकडून १३ लाख ३३ हजार १२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती, अशी माहितीही मंत्री रावल यांनी दिली.


तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावी, अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास राज्यातील १०० टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Pune Spurious Liquor Tragedy : विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये विधान परिषदेत खडाजंगी; मुख्य आरोपींवर 'मकोका' लावणार, सर्व २२ मृतांच्या वारसांना ७ दिवसांत मदत

विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या

Meghna Sakore-Bordikar : ठाणे जिल्ह्याच्या पाणी नियोजनासाठी आता राज्य सरकारची उच्चस्तरीय संयुक्त बैठक

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या शहरीकरणामुळे

Sanjay Dina Patil : पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा" – संजय दिना पाटील यांना शिंदेंचा सल्ला

रोज अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ करणाऱ्यांवर शिंदे यांनी व्यक्त केला संताप मुंबई : पत्रकारांबाबत केलेल्या

Central Railway AC Local : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार; थंडगार प्रवासाची संधी वाढणार

मुंबई : मुंबईतील लोकल प्रवास अधिक आरामदायी करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Chandrashekhar Bawankule : अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी 'टास्क फोर्स'

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांच्या

Anna Bansode : चिंचवडमध्ये ‘अजितसृष्टी’

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे; 'एमआयडीसी'चे प्लॉटिंग तात्काळ थांबवण्याचे निर्देश मुंबई : पिंपरी-चिंचवड