ठाण्यात १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात

विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार


ठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील भातसा नदीवरील बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार असल्याने नदीतील पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. परिणामी पिसे येथील उदंचन केंद्रातील पाण्याची पातळी घटली असून, ठाणे महापालिकेला मिळणारा पाणीपुरवठा सुमारे २० टक्क्यांनी कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठामपाने शहरात पुढील १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून, विविध विभागांमध्ये २४ तासांचे पाणी शटडाऊन घेण्यात येणार आहे. काही भागांत कमी दाबाने तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


२८ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत रोज वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सकाळी ९ ते पुढील दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. वागळे, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा, कोपरी, राबोडी, माजीवाडा, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवली आदी प्रमुख भागांचा समावेश आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Face Serum : सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड, हायल्यूरॉनिक ॲसिड...तुमच्या त्वचेसाठी काय योग्य?

 सॅलिसिलिक ॲसिड, नायसिनमाइड, हायल्यूरॉनिक ॲसिड... यापैकी कोणते सीरम तेलकट त्वचेवर आणि कोणते कोरड्या त्वचेवर

Giloy : गुळवेल घरी कशी वाढवावी? सोपी पद्धत आणि योग्य काळजी

आजच्या काळात निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. अशा अत्यंत

Home Decor Ideas : रिकाम्या बाल्कनीचा असा उपयोग करा; या ४ सोप्या DIY कल्पनांमुळे तुमचे घर अधिक सुंदर दिसेल

बाल्कनीच्या रेलिंगचा पुरेपूर उपयोग करण्याच्या पाच सोप्या घरगुती पद्धती खालीलप्रमाणे आहेत: अनेकदा आपण

Bollywood Movie : मिर्झापूर द मूव्हीच्या हाय-एनर्जी रॅप गाण्यात दिसणार का ढांडा न्योलीवाला?

टीझरला मिळालेल्या प्रचंड आणि जबरदस्त प्रतिसादानंतर आता "मिर्झापूर द मूव्ही" हा चित्रपट(Movie) ११ ऑगस्ट रोजी आपल्या

Airplane Accident : विमानाचा भीषण अपघात; पर्यटकांचे विमान शेतात कोसळून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू 

 पेरू देशात पर्यटकांचे विमान शेतात कोसळून भीषण अपघात झाला या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू  झाला. दक्षिण

Malshej Ghat : माळशेज घाटात रस्ता खचला; मार्ग पूर्णपणे बंद! पर्यायी मार्गावर रात्रभर भीषण वाहतूक कोंडी

मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील प्रसिद्ध माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी