प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात

माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमता


विशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्सचे आहे. आपली बहुतांशी कामे मानव आता यंत्रमानवाकडून करून घेऊ लागला आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय रेल्वेनेही आपल्या कामात यंत्रमानवाचा वापर करायला सुरुवात केली आहे. विशाखापट्टणम रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मानवरूपी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात केला आहे.


भारतीय रेल्वेच्या पूर्व किनारपट्टी भागात प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी ‘एएससी अर्जुन’ हा मानवरूपी (ह्युमनॉइड) यंत्रमानव कार्यान्वित करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिपत्याखाली हा यंत्रमानव तैनात करण्यात आला आहे. आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तन मोहिमेचा तो एक भाग आहे. यामागील उद्देश सुरक्षा यंत्रणा बळकट करणे आणि प्रवाशांना अधिक प्रभावी सहाय्य देणे हा आहे.


‘प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि सेवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर हा मानवरूपी रोबोट तैनात करून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे,’ असे ‘आरपीएफ’चे महानिरीक्षक आलोक बोहरा यांनी सांगितले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ललित बोहरा यांनी सांगितले की, हा यंत्रमानव प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ताने सुसज्ज आहे. त्यामुळे तो ‘आरपीएफ’ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांसाठीही एक स्मार्ट सहाय्यक म्हणून काम करतो.


प्रवाशांशी साधणार संवाद


या यंत्रमानवाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये चेहरा ओळख प्रणालीद्वारे घुसखोरी शोधणे, एआय-आधारित गर्दी घनता विश्लेषण, इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये बहुभाषिक सार्वजनिक घोषणा, तसेच अडथळे टाळत अर्धस्वायत्त पद्धतीने प्लॅटफॉर्मवर गस्त घालण्याची क्षमता यांचा समावेश आहे. याशिवाय, एकात्मिक डॅशबोर्डच्या माध्यमातून रिअल-टाइम परिस्थितीची जाणीव, आग व धूर ओळखून तत्काळ इशारे देणे, तसेच मैत्रीपूर्ण हालचाली आणि माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमताही या यंत्रमानवात आहे.

Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)