पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने २०२६ च्या ४५ पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक अशी या पुरस्कारांची ओळख आहे. यामुळे हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. यंदा महाराष्ट्रातील चार जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकनाट्य क्षेत्रातले तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीरंग लाड तसेच पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करणाऱ्या मुंबईच्या आर्मिडा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.



पद्मश्री पुरस्कार विजेते २०२६



  1. आर्मिडा फर्नांडिस (मुंबई) - आशियातील पहिली रक्तपेढी स्थापन करण्यात मोलाचे योगदान

  2. अंके गौडा- भारतातील सर्वात मोठ्या ग्रंथालयाची उभारणी

  3. भगवानदास रायकवार- बुंदेली वॉर आर्टचे प्रशिक्षक म्हणून पारंपरिक युद्धकलेचे जतन व प्रसार

  4. बृजलाल भट्ट (जम्मू-काश्मीर)- समाजसेवा व योगशिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी

  5. बुदरी ठाडी (छत्तीसगड)-नक्षलग्रस्त भागात शिक्षण पोहोचवण्याच्या कार्यासाठी.

  6. चरण हेम्ब्राम (ओडिशा)- संथाली भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक.

  7. चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)- पितळकलेत (ब्रास आर्ट) लोकांना प्रशिक्षण देऊन पारंपरिक हस्तकलेचा विकास

  8. धार्मिक लाल चुन्नीलाल पांड्या- शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील योगदानासाठी

  9. डॉ. कुमारस्वामी थंगराज-जेनेटिक्स (आनुवंशिक संशोधन) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी

  10. डॉ. पद्मा गुरमीत (लडाख)- सोवा-रिग्पा या पारंपरिक वैद्यक पद्धतीच्या संवर्धनासाठी


कोण आहेत तमाशा कलाकार रघुवीर खेडकर ?



  1. चार दशकांहून अधिक काळापासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत

  2. तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत आणि तमाशा फडचालक

  3. 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या संघटनेचे अध्यक्ष

  4. तरुणपणी तमाशात कथ्थक आणि लोककलेचे मिश्रण असलेले थाळीनृत्य करण्यासाठी लोकप्रिय

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे