मुलीला अंक लिहिता आले नाही म्हणून पित्याकडून बेदम मारहाण!

चार वर्षांच्या मुलीचा दु:खद अंत


हरियाणा : हल्ली पालकांकडूनच मुलांवर शिक्षणाच्या बाबतीत अतिरिक्त ताण टाकला जातो. मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर शिक्षणाचा भार टाकला जातो. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये असेच एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. १ ते ५० अंक लिहिता आले नाहीत म्हणून वडिलांनी केलेल्या मारहाणीत चार वर्षीय मुलीचा दुःखद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे.


फरीदाबादच्या सेक्टर ५८ मधील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपी कृष्णा जयस्वाल (३१) याला अटक करण्यात आली आहे. शहरातील न्यायालयात त्याला हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील खेरतिया गावचा रहिवासी असलेला जयस्वाल आपल्या कुटुंबासह फरीदाबादमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, जयस्वाल आणि त्यांची पत्नी दोघेही खासगी कंपनीत नोकरी करत होते. आई दिवसा कामावर जायची. तर जयस्वाल रात्रपाळी करायचा दरम्यान दिवसा मुलांची काळजी घेणे आणि त्यांचा अभ्यास करून घेण्याचे काम जयस्वाल करत असे.सदर घटना २१ जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, जयस्वालने मुलीला एक ते ५० पर्यंतचे अंक लिहिण्यास सांगितले. मात्र मुलीला अंक लिहिता आले नाहीत. त्यामुळे जयस्वालने मुलीला जबर मारहाण केली. लाटण्याने मारून मुलीला भिंतीवर आपटल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. मुलीला मारहाण केल्यानंतर आरोपी वडील तिला रुग्णालयात घेऊन गेला. त्याने त्याची पत्नी रंजिताला सांगितले की, मुलगी खेळताना पायऱ्यांवरून खाली पडली. मात्र घटनेच्या वेळी त्याचा सात वर्षांचा मुलगा घरीच होता. त्याने आईला सर्व हकीकत सांगितली आणि वडिलांच्या कृत्याची माहिती उघड झाली. मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्यानंतर पत्नी रंजिताने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयालाही हीच बाब आरोपी वडिलांनी सांगितली होती.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय