महापौरपदासाठी आकड्यांचा खेळ!

निकालानंतर युती - आघाड्यांचा नगरसेवकांना विसर


मुंबई : राज्यातील २९ महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढल्यानंतर, महापौरपदावर आपल्या पक्षाची वर्णी लागताच, विरोधी पक्षांतील तसेच अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पडद्यामागून त्या त्या महापालिकेत अधिक संख्याबळ असलेल्या पक्षांकडून केले जात आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या मनसेने शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर, सत्ताधारी आणि विरोधकांनी नगरसेवक कधी कुठे जाईल, याची खात्री संबंधित पक्षांच्या नेत्यांनाही नसल्याने महापौरपदाच्या निवडीवरून राज्यातील अनेक महापालिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत. जनतेच्या समोर युती - आघाड्या म्हणून सामोरे गेल्यानंतरही, निकालानंतर आपल्याच मित्र पक्षांचा नगरसेवकांना विसर पडला असून, प्रबळ संख्याबळ असलेल्या पक्षांकडून स्वत:च्या ताकदीवर जादूई आकडा गाठण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव होताना दिसत आहे.


अमरावती महापालिकेत संख्याबळानुसार भाजप महापौर पदासाठी दावा करणार असला तरी बसपच्या तीन नगरसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. एकाही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ४४ ही आकडेवारी जुळविण्यासाठी आता नेत्यांची दमछाक होत आहे. पद आणि अन्य मागण्या पूर्ण कशा कराव्या यातच चर्चेच्या फेऱ्या आटोपत असून, ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही. तसेच भाजप महापौर पदासाठी कुणाचे नाव निश्चित करतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचीसुद्धा तितकीच भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. किंबहुना कोणता पक्ष कोणाशी आघाडी, युती करणार यावरच महापौरपदाचे गणित जुळणार आहे.


चंद्रपूर महापालिकेत जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असे उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडट्टीवार यांच्यात झालेल्या वादानंतर अडीच वर्षे महापौर आपल्या गटाचा असेल असा फॉर्म्युला ठरविला असला तरी, उबाठाच्या पाठिंबावर काँग्रेसला जादूई आकडा गाठता येणार असल्याने, उबाठाचा भाव
वधारला आहे.


भिवंडी-निजामपूर महापालिकेत भाजपचे माजी खासदार कपिल पाटील चावी फिरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या हाता-तोंडाशी आलेले महापौरपद थोडक्यात हुकण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र