Video : धक्कादायक! पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला घेरलं अन् बुरखा घालायला लावला; 'त्या' व्हिडिओने खळबळ

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील बिलारी शहरात एका अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनीसोबत घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. १२ वीत शिकणाऱ्या पीडितेच्याच पाच मुस्लिम मैत्रिणींनी तिला कोचिंग क्लासबाहेर घेरून जबरदस्तीने बुरखा परिधान करण्यास भाग पाडले. "बुरख्यात तू सुंदर दिसशील आणि इस्लाम स्वीकारल्यास तुझे नशीब बदलेल," असे सांगून मुलींनी पीडितेवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. २० डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचही आरोपी मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



मुरादाबाद प्रकरणातील पीडितेच्या भावाचा मोठा खुलासा...


पीडित मुलीच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या बहिणीचे पद्धतशीरपणे 'ब्रेनवॉशिंग' करण्यात आले असून, तिला कुटुंबापासून तोडण्याचा आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा भावाने केला आहे. पीडित मुलगी शाहकुंज कॉलनीतील एका ट्यूटरकडे शिकवणीसाठी जात असे. तिच्यासोबतच परिसरातील ५ मुस्लिम मुलीही अकरावी-बारावीत शिकत होत्या. शेजारी आणि मैत्रिणी असल्याने त्या एकत्र शाळेत आणि कोचिंगला जात असत. मात्र, याच मैत्रीचा फायदा घेऊन आरोपी मुलींनी पीडितेच्या मनात तिच्या स्वतःच्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्यास सुरुवात केली. तिला वारंवार इस्लाम धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवण्यात आले, ज्यामुळे ती घरातील लोकांचेही ऐकेनाशी झाली होती. २० डिसेंबर रोजी ट्यूशनवरून घरी परतत असताना या पाचही मुलींनी पीडितेला वाटेत अडवून तिला जबरदस्तीने बुरखा घालण्यास भाग पाडले. या प्रकरणावर भाष्य करताना पीडितेच्या भावाने सांगितले की, "हा केवळ मुलींमधील वाद नसून यामागे एखादी मोठी इस्लामिक संघटना असू शकते. अल्पवयीन हिंदू मुलींना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्यासाठी विद्यार्थीनींचा वापर केला जात आहे." या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी आता जोर धरत आहे.



मुरादाबादमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाने हिंदू संघटना आक्रमक!


या प्रकारामुळे स्थानिक हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेला धर्मांतराचा हा छुपा खेळ तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. शाळा आणि कोचिंग क्लासेसना अशा धार्मिक वादांपासून आणि 'धर्मांतराच्या सावली'पासून वाचवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. एसपी ग्रामीण कुंवर आकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. तपासादरम्यान जे काही पुरावे हाती लागतील, त्यावरून पुढील ठोस पावले उचलली जातील. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, जर या पाचही मुली दोषी आढळल्या, तर त्यांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल. आरोपी मुली अल्पवयीन असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत 'शांती निकेतन' किंवा 'बाल सुधारगृहात' पाठवले जाण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यासाठी कमाल ५ वर्षांचा कारावास आणि १५,००० रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत सहसा अटक केली जात नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य आणि सामाजिक संताप पाहता, पोलीस विशेष अधिकारांचा वापर करून या मुलींना अटक करण्याच्या विचारात आहेत.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली