भाजप नगरसेविका मृणाल कांबळेंच्या भावावर हल्ला, १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे  : भवानी पेठ परिसरात बॅनर लावण्यावरून झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका मृणाल कांबळे यांचा भाऊ शंतनू उर्फ बापू यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. खडक पोलिसांनी १४ ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. शंतनू यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुरुवारी (२२ जाने.) दुपारी सुमारे ३.३० वाजता काशेवाडी परिसरात निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर कांबळे समर्थकांकडून मतदारांचे आभार मानण्यासाठी बॅनर लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना पाटील यांचे पती तुषार यांचे समर्थक घटनास्थळी आले व त्यांनी बॅनर लावू नये असे सांगितले. यावरून वाद वाढला आणि जमावाने शंतनू यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार आहे. पुन्हा त्या भागात बॅनर लावल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम करत आहेत. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाही नोंदवण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,