महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत हवामानाचा बदल; ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, बळीराजा चिंतेत

मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांची दाटी आणि हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


गेल्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदवली जात आहे. सकाळच्या वेळेस काही भागांत धुक्याची शक्यता असून, दिवसभर उष्णता जाणवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे, तर दुसरीकडे समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी, दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत असून वाऱ्याचा वेगही मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागांत पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.


या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेमुळे तूर, हरभरा, ज्वारी, मका तसेच कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंबा आणि काजूच्या मोहोरालाही धोका निर्माण झाला आहे.


दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

The Koyna Dam : कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे

Chandrashekar Bawankule : मुंबई आणि पुण्यातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घर

वगळलेल्या भागातील बांधकामांचे सर्वेक्षण होणार; कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन मुंबई :

Junk Food Ban : शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांचा समावेश असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना लहान वयातच लठ्ठपणा तसेच विविध

Sunetra Pawar : मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि अजित पवारांच्या जयंतीदिनी ९५ हजार नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला

'महा आरोग्य शिबिराला' राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ हजार ९४० नागरिकांनी रक्तदान केले मुंबई : मुख्यमंत्री

Urban Development Department : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि 'जीओ टॅगिंगची' नजर - नगरविकास विभागाचा निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणेची

Pratap Sarnaik : NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुंबई : एसटी प्रवासात