महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत हवामानाचा बदल; ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, बळीराजा चिंतेत

मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांची दाटी आणि हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


गेल्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदवली जात आहे. सकाळच्या वेळेस काही भागांत धुक्याची शक्यता असून, दिवसभर उष्णता जाणवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे, तर दुसरीकडे समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी, दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत असून वाऱ्याचा वेगही मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागांत पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.


या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेमुळे तूर, हरभरा, ज्वारी, मका तसेच कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंबा आणि काजूच्या मोहोरालाही धोका निर्माण झाला आहे.


दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले