महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत हवामानाचा बदल; ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, बळीराजा चिंतेत

मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांची दाटी आणि हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


गेल्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदवली जात आहे. सकाळच्या वेळेस काही भागांत धुक्याची शक्यता असून, दिवसभर उष्णता जाणवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे, तर दुसरीकडे समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी, दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत असून वाऱ्याचा वेगही मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागांत पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.


या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेमुळे तूर, हरभरा, ज्वारी, मका तसेच कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंबा आणि काजूच्या मोहोरालाही धोका निर्माण झाला आहे.


दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Valvan Mahotsav 2026 : महिला बचत गटांच्या हाताची चव पोहोचणार थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत

येत्या ११ आणि १२ मे २०२६ रोजी ‘वाळवण महोत्सव' मुंबई (विशेष प्रतिनिधी) महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना

Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) हुतात्मा स्मारकाच्या (Hutatma Smarak Chowk) सुशोभिकरणाच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात चांगलीच

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना दिला चेकमेट; प्राधान्य क्रम नाकारलेला प्रस्ताव बहुमताने केला मंजूर

वडाळ्यातील आझादनगर, कमलानगर पुनर्विकास प्रकल्पाला मिळणार गती मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत वडाळा

SSC Result 2026 : महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

यंदा ७७ शाळांचा निकाल १०० टक्के; ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मुंबई (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र

World Thalassemia Day : जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून, महापौर आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केले रक्तदान

रक्त कमतरता (थॅलेसेमिया) ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदानाबाबत जनजागृतीचा कृतिशील संदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी

Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, ठाणे आणि मुलुंड