महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत हवामानाचा बदल; ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, बळीराजा चिंतेत

मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांची दाटी आणि हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


गेल्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदवली जात आहे. सकाळच्या वेळेस काही भागांत धुक्याची शक्यता असून, दिवसभर उष्णता जाणवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे, तर दुसरीकडे समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी, दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत असून वाऱ्याचा वेगही मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागांत पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.


या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेमुळे तूर, हरभरा, ज्वारी, मका तसेच कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंबा आणि काजूच्या मोहोरालाही धोका निर्माण झाला आहे.


दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य

Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: