‘एमआयएम’च्या नगरसेविका सहर शेखला पोलिसांची नोटीस

मुंब्रा  :महापालिका निवडणुकीत मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. विजयानंतर केलेल्या आक्रमक भाषणामुळे मुंब्रा पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना नोटीस बजावली आहे. विजयानंतरच्या सभेत सहर शेख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता ‘कैसा हराया?’ असा टोला लगावत, पुढील पाच वर्षांत “संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू,” असे विधान केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या विधानाची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावली असून, समाजात असंतोष निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळण्याची कडक तंबी दिली आहे. दरम्यान, वाद वाढल्यानंतर सहर शेख यांनी स्पष्टीकरण देत, “माझं वक्तव्य सटायर स्वरूपाचं होतं. त्याला सांप्रदायिक अर्थ काढू नये. मी पूर्णपणे सेक्युलर विचारांची आहे,” असा दावा केला आहे. आव्हाडांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्र्यात एमआयएमने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात असून, त्यानंतर निर्माण झालेल्या या वादामुळे परिसरातील राजकारण अधिक तापले आहे.

Comments
Add Comment

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या