बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे बसमध्ये असलेल्या ३० जणांचे प्राण वाचले.


वरुड परिसरात धाड–बुलढाणा मार्गावरुन बस पुढे जात होती. वरुड–सोयगाव–जामठी मार्गावर धावणाऱ्या बसचा नेहमीप्रमाणे वेगाने प्रवास सुरू होता. प्रवासी बसमध्ये बसले होते आणि आपापल्या कामात मग्न होते अथवा झोपले होते. अचानक जोराचा आवाज ऐकू आला. सगळ्यांचे लक्ष आवाजाच्या दिशेने वेधले गेले. काही क्षणांतच ब्रेक काम करत नसल्याचं चालकाच्या लक्षात आलं. रस्त्याच्या दुतर्फा वस्ती आणि वर्दळ असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक झाली होती.


वेगात असलेली बस थांबवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखून निर्णय घेतला. समोर येणाऱ्या लोकांना किंवा घरांना धडक होऊ नये म्हणून बस एका विद्युत खांबाला धडकवण्यात आली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली.


या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. चालकाच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले