तंत्रज्ञानाच्या जोरावर चार राज्यांत शोधमोहीम; ४ राज्ये , ३० टोलनाके, ३०० सीसीटीव्ही पालथे घालत वर्धा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

वर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या १० चाकी ट्रकचा शोध घेण्यासाठी वर्धा पोलिसांनी केलेली तपासमोहीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोणताही थेट धागा हाती नसताना आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करत पोलिसांनी चार राज्यांतील हालचाली तपासल्या आणि अवघ्या आठ दिवसांत ट्रकचा ठावठिकाणा लावला.


या तपासादरम्यान पोलिस पथकाने महाराष्ट्राबाहेर जाऊन मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील मार्गांचा मागोवा घेतला. विविध महामार्गांवरील टोलनाक्यांमधील माहिती तसेच शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फूटेज बारकाईनं तपासण्यात आले. माहिती मिळवण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी आपले वेषही बदलले.


तपासातून मिळालेल्या संकेतांच्या आधारे ट्रक मध्यप्रदेशातील अतिदृग्ग्रम भाग असलेल्या अलीयापुर जिल्ह्यातील ग्राम बोरकरा येथून शोधून आणला. या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून पुढील तपास सुरू आहे.



दारू विक्री संदर्भात कठोर पाऊले


दरम्यान, जिल्ह्यात बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतुकीवरही पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. पुलगाव उपविभागात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला असून संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


वर्धा पोलिसांच्या या दोन्ही कारवायांमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तंत्रज्ञान आणि नियोजनाचा प्रभावी वापर कसा केला जाऊ शकतो, याचं उदाहरण समोर आलं आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर