जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा जवान जखमी झाले.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार २२ जानेवारी रोजी जवानांची बुलेटप्रूफ कॅस्पिअर गाडी एका मोहिमेवर जात होती. प्रवासादरम्यान डोडा घाटात गाडी ४०० फूट खोल दरीत कोसळली. भदरवाह - चंबा खन्नी मार्गावरून जात असताना दरीत कोसळली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घटनेची माहिती मिळताच एक्स पोस्ट करुन शोक प्रकट केला.


लष्करी वाहन दरीत कोसळल्याची माहिती मिळताच लष्कराने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी जवानांना हेलिकॉप्टद्वारे उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्रतिकूल हवामान असताना प्रवास सुरू होता. या प्रवासादरम्यान एका टप्प्यावर चालकाने नियंत्रण गमावले आणि वाहन दरीत कोसळले. या प्रकरणी नियमानुसार लष्करी अधिकारी तपास करत आहेत. अपघाताची सविस्तर चौकशी करुन अधिकारी वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अपघाताची माहिती मिळताच शोक प्रकट केला. संरक्षणमंत्र्यांनी जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन