Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शीव उड्डाणपुलावर होणारी वाहनांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने आता या पुलाला समांतर असा एक नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी व्हीजेटीआय (VJTI) संस्थेने आपला तांत्रिक अहवाल सादर केला असून, हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सध्या शीव उड्डाणपुलावरून ठाणे आणि पूर्व उपनगरांकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, तर दक्षिण मुंबईत सीएसएमटीच्या दिशेने येण्यासाठी केवळ एकच मार्ग उपलब्ध आहे. यामुळे विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. आता नवीन समांतर पूल उभारल्यामुळे ठाण्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहनांना एक थेट आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांचा इंधन आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. कोणताही पूल उभारण्यापूर्वी तो तांत्रिकदृष्ट्या किती सक्षम असेल आणि त्याचा वाहतुकीवर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करणे आवश्यक असते. या पुलामुळे शीव परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा सकारात्मक अहवाल संस्थेने दिला आहे. या अहवालानंतर आता महापालिका लवकरच या कामाचे कार्यादेश (Work Orders) जारी करणार असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल. एककीडे समांतर पुलाची तयारी सुरू असतानाच, महापालिकेने सध्याच्या जुन्या शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे कामही हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने, त्याच्या मजबुतीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. समांतर पुलाच्या उभारणीनंतर हा संपूर्ण पट्टा 'ट्रॅफिक फ्री' होण्याच्या दिशेने पाऊल पडणार आहे.



अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची मोठी माहिती


शीव उड्डाणपुलाला समांतर पूल बांधणे तांत्रिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या शक्य आहे का? याची चाचपणी करण्याची जबाबदारी नामवंत व्हीजेटीआय संस्थेवर सोपवण्यात आली होती. संस्थेने आपल्या सखोल अभ्यासानंतर हा प्रकल्प पूर्णपणे 'व्यवहार्य' (Feasible) असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे. या अहवालामुळे महापालिकेचा मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला असून, प्रकल्प अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले की, पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे अनिवार्य आहे. पुलाचे काम सुरू असताना या परिसरातील वाहतूक वळवावी लागेल, ज्याचा परिणाम दैनंदिन प्रवासावर होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांशी चर्चा सुरू असून, एनओसी मिळताच या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जमिनीवर सुरू होईल.



कसा असेल हा मार्ग?


मुंबई महापालिकेकडून केशवराव खाडये मार्गावरील पूर्वेकडे उभारण्यात येणाऱ्या महालक्ष्मी केबल स्टेड उड्डाणपुलाचा विस्तार एन. एम. जोशी मार्गासह एस ब्रिज जंक्शनजवळ आणि हाजी अली जंक्शनजवळून महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंत केला जाणार होता. हे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. मात्र वाहतूक पोलिसांनी या कामाला ना हरकत प्रमाणपत्र जाहीर केले नसून या ठिकाणी पूल आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. विस्तारित कामच रद्द झाल्याने याच कंत्राटदाराला शीव उड्डाणपुलाला समांतर पूल उभारण्याचे काम देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण