मंत्री नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघातून भाजपने उघडले विजयचे खाते

- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन जागा बिनविरोध


मुंबई : महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपने बिनविरोध विजयाची परंपरा कायम ठेवत आपले खाते उघडले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या कणकवली–देवगड–वैभववाडी विधानसभा मतदारसंघात पंचायत समितीच्या दोन जागांवर भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या साधना नकाशे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत भाजपाच्या अक्षता डाफळे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र या दोन अर्जांव्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोकिसरे गणामधून भाजपाच्या साधना नकाशे यांची बिनविरोध निवड घोषित केली जाणार आहे.

दरम्यान, कणकवली तालुक्यातील बिडवाडी पंचायत समिती गणामध्येही भाजपच्या उमेदवाराचा विजय बिनविरोध निश्चित झाला आहे. भाजपाच्या उमेदवार संजना राणे यांनी उबाठा गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांच्याविरोधात हरकत घेतली होती. २०१४ नंतर तीन अपत्ये झाल्याचा मुद्दा उपस्थित करत करण्यात आलेली ही हरकत ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे बिडवाडी गणामधून भाजपाच्या संजना राणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
........
मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन

दरम्यान, या निकालावर प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती निवडणुकीतील भाजप–महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, बिनविरोध मिळालेल्या या विजयामुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीला बळ मिळाले आहे.
Comments
Add Comment

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Mumbai: महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड भरावा लागणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने दोन

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी

विवेक भीमनवार यांनी घेतली एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक

Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार; 'या' तारखांना निवडणूक होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू