T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे बांगलादेश सात फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद झाला आहे. बांगलादेश वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्याने आता स्कॉटलँड संघाची T20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे.


आयसीसीचे प्रतिनिधी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली. या चर्चेवेळी भारतात क्रिकेट खेळणार नाही, तिथे खेळाडूंच्या सुरक्षेला धोका आहे, असे कारण बांगलादेशकडून देण्यात आले. प्रत्यक्षात आंरतरराष्ट्रीय यंत्रणांनी भारत वर्ल्ड कपसाठी सुरक्षित देश असल्याचा अहवाल दिला आहे. हा अहवाल असताना बांगलादेशला कसली भीती वाटत आहे या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देणे त्यांना जमले नाही. अखेर आयसीसीने अंतिम निर्णयासाठी बांगलादेशला विहित मुदत दिली. ही मुदत संपण्याआधीच बांगलादेशने T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली. बांगलादेशच्या बहिष्कारामुळे T20 वर्ल्ड कप २०२६ नव्या संघाच्या समावेशाबाबतची घोषणा आयसीसी लवकरच करणार असल्याचे समजते.


बांगलादेशने T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालण्याआधी आयसीसीच्या सर्व सदस्य देशांच्या प्रतिनिधींची एक ऑनलाईन बैठ झाली. या बैठकीत बांगलादेशच्या भूमिकेवर मतदान झाले. यात बांगलादेश आणि पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांनी ठामपणे बांगलादेशच्या भूमिकेला ठाम विरोध दर्शवला. एकाकी पडत असल्याची जाणीव झाल्यानंतर बांगलादेशने अखेर T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली.

Comments
Add Comment

Italian Open 2026 Jannik Sinner : जॅनिक सिनर ठरला इटालियन ओपनचा विजेता; केली नोव्हाक जोकोविचच्या विक्रमाशी बरोबरी

- जॅनिक सिनर ठरला करिअर गोल्डन मास्टर्स पूर्ण करणारा जगातील दुसरा टेनिसपटू जॅनिक सिनरने इटालियन ओपन २०२६ चे

IPL 2026 DC vs RR : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर ५ विकेट्सने मात

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली

Hind Kesari : फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळचा हात जखमी; महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा 'हिंद केसरी'!

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा

Indian Cricket Team : टीम इंडियात फेरबदलाचे संकेत; पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याची शक्यता!

मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या