उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान

उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत लागलेल्या चढाओढीमध्ये अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे. कोकण भवन येथे झालेल्या अधिकृत नोंदणीत शिवसेनेने ४० नगरसेवकांचे संख्याबळ दाखवून बहुमताचा आकडा पार केला. शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान यांची नियुक्ती झाली असून यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


उल्हासनगर महापालिकेत सत्तेसाठी ४० या जादूई आकड्याची गरज होती. निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. महापालिकेत भाजप-३७, शिवसेना-३६, वंचित बहुजन, आघाडी- २, साई पक्ष-१, काँग्रेस-१, अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडे ३७ नगरसेवक असल्याने ते सत्तेच्या जवळ होते, मात्र शिवसेनेने अत्यंत प्रभावीपणे इतर छोट्या पक्षांना आणि अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.


शिवसेनेचे- ३६, वंचित बहुजन आघाडीचे २, साई पक्षाचा १ आणि १ अपक्ष यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. या युतीमुळे शिवसेनेचे एकूण संख्याबळ ४० वर पोहोचले आहे. कोकण भवन येथे या ४० नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी शिवसेना म्हणून करण्यात आली, अशी माहिती नवनिर्वचित गटनेते अरुण आशान यांनी दिली. या सर्व घडामोडींनंतर अरुण आशान यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत पक्षाची ध्येयधोरणे राबवणे आणि ४० नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे.


महापौरपदाचा मार्ग मोकळा


भाजप ३७ जागांवर अडकल्याने आणि शिवसेनेने बहुमताचा ४०चा आकडा गाठल्याने आता उल्हासनगरच्या महापौरपदावर शिवसेनेचा दावा भक्कम झाला. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता असून शहरात आता शिवसेनेची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

Dombivli Shardul Vichare : डोंबिवलीच्या शार्दुलने CA इंटरमीडिएटमध्ये देशात पटकावला पहिला क्रमांक

डोंबिवली : डोंबिवलीतून अभिमानाची बातमी समोर आली आहे. डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Ulhasnagar Lizard In Manchurian : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू

मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre)

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)

Yamdut Campaign : दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांची अनोखी ‘यमदूत’ मोहीम; रुळ ओलांडणाऱ्यांचे प्रबोधन

ठाणे: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी ठाणे रेल्वे

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण