अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल


नवी मुंबई : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा अलिबागचा हापूस अखेर मुंबईच्या बाजारात आला आहे. अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक गौरव पाटील यांच्या बागेतील हापूसच्या दोन पेट्या नवी मुंबई एपीएमसीत दाखल झाल्या.


अलिबाग तालुक्यातील आंब्याला मोठी मागणी असते. भातशेतीसोबत आंबा लागवडीकडे अलिबागच्या शेतकऱ्यांचा कल वाढत असून तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने आंबा शेतीकडे वळत आहेत. यंदा पावसाने ऑक्टोबर अखेरपर्यंत हजेरी लावल्याने आंबा पिकासमोर अनेक अडचणी होत्या. मात्र कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी फवारणी व आंब्याचे झाड सुरक्षित राहिले. कठीण हवामानातही गौरव पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजेच यंदाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी बाजारात दाखल झाली.


यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने मोठे आव्हान होते. तरीही योग्य देखभाल आणि मेहनतीमुळे आंबा लवकर तयार झाला. या हंगामातील पहिली हापूसची पेटी वाशी एपीएमसीला पाठवता आली, याचा आनंद आहे, असे गौरव पाटील आंबा उत्पादक यांनी सांगितले. अलिबागच्या आंब्याची आवक सुरु झाली असली तरी आंबा खवय्यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या हापूस आंब्याची प्रतिक्षा असते.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका