कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५२ नवीन चेहरे

माजी महापौर-उपमहापौरांना धक्का


कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला असून या निकालात निवडलेल्या १२२ नगरसेवकांपैकी ५२ नवीन नगरसेवक निवडून आल्याने मतदारांनी नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये यंदा परिवर्तनाचे वारे वाहिले आहेत. निवडणुकीत महायुतीसह अन्य पक्षांतील काही उमेदवारांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत दमदार विजयही संपादन केला आहे. त्यात अनघा देवळेकर, राहुल कोट, तेजश्री गायकवाड, रोहन कोट, रूपेश सकपाळ, किरण भांगळे, डॉ. तनुजा वायले, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, संकेश भोईर, माया कांबळे, विशाल गारवे, दर्शना काळे, शामल गायकर, हेमलता पवार, गणेश लांडगे, रमीझ मणियार, समीना शेख, कांचन कुलकर्णी, अमित धाक्रस, मेघाली खेमा, रेश्मा निचळ, हर्मेश शेट्टी, सरिता निकम, ऐश्वर्या तांबोळी, स्नेहल मोरे, कीर्ती ढोणे, पूजा गायकवाड, सरोज राय, मधुर म्हात्रे, वंदना महिले, निलेश खंबायत, प्रणाली जोशी, कैलास जोशी, रंजना पेणकर, आसावरी नवरे, अभिजीत थरवळ, हर्षल मोरे, सूरज मराठे, प्रल्हाद म्हात्रे, रविना म्हात्रे, संदेश पाटील, डॉ. रसिका संदेश पाटील, रसिका कृष्णा पाटील, मृदुला नाख्ये, समीर चिटणीस, कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, विजेयश्री म्हात्रे, सविता भोईर, स्नेहा भाने, पूजा म्हात्रे आदींचा समावेश आहे.


पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात असलेल्या अपर्णा भोईर या माजी महापौर वैजयंती घोलप यांना पराभूत करून जायंट किलर ठरल्या आहेत, तर राजकारणातील आणखी एक नवा चेहरा असलेल्या मधुर म्हात्रे हे माजी उपमहापौर विकी तरे यांना पराभूत करून जायंट किलर ठरले आहेत. याशिवाय अन्य ५२ चेहऱ्यांना मतदारांनी कौल देत एका नवीन पर्वाची सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे, तर या नवनिर्वाचित नवीन चेहऱ्याचे नगरसेवक आपल्या कामगिरी आणि, लोकांचे प्रश्न हाताळून समस्या सोडवून प्रभागाचा विकास करण्यात किती यशस्वी होतात हे आगामी काळात चित्र दिसणार आहे.

Comments
Add Comment

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक