शिवसेनेचे 'मिशन मुंबई महापालिका'

कडोंमपा, उल्हासनगरमध्ये भाजपला ‘चेकमेट’ करण्याचा डाव


ठाणे/ कल्याण/ उल्हासनगर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या स्पर्धेचा परिणाम एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही दिसू लागला आहे. मुंबईचे महापौरपद मिळाले नाही, तर कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये शिवसेनेकडून भाजपला 'चेकमेट' करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.


ठाण्यातही महापौरपदावरून ताण:


ठाणे महानगरपालिकेत शिंदे सेनेने ७५ जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले आहे, तर भाजपला केवळ २८ जागांवर समाधान मानावे लागले. तरीही भाजपकडून ठाण्यात किमान दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईनंतर आता ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्येही भाजप-शिवसेना यांच्यात महापौरपदावरून संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र डावपेच?


कडोंमपामध्ये एकूण १२२ नगरसेवक असून शिवसेनेचे ५३, तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. युतीत निवडणूक लढवूनही दोन्ही पक्षांतील संख्याबळात फारसा फरक नसल्याने भाजपकडून सत्तेत समसमान वाटपाची मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना महापौरपद व प्रमुख पदे सोडण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्याकडून इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क वाढवण्यात येत असल्याची चर्चा असून, उबाठातील एका नगरसेवकाच्या भेटीने राजकीय वातावरण तापले आहे.


उल्हासनगरमध्ये वंचितसोबत युतीची शक्यता :


उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपचे ३७, तर शिंदे गटाचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. अंबरनाथप्रमाणे येथेही शिंदे गट भाजपला डावलून वेगळी सत्ता स्थापन करू शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंब्याचे पत्र दिल्याची माहिती असून, त्यामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय